नवीन लेखन...

सामाजिक बांधिलकीची जाणीव

सामाजिक बांधिलकीची जाणीव बालपणापासूनच लहान मुलांमध्ये निर्माण करणं जरुरीचं असतं, त्याचं भान त्यांच्याकडून राखलं जातं का? हे पाहणं गरजेचं असतं. आजची लहान मुलंच ह्या देशासाठी उद्याची संपत्ती असल्याचं आपण बोलतो, ऐकतो; त्यानुषंगाने मुलांचा विकास झाला तरंच राष्ट्राची प्रगती होईल. त्या प्रगतीच्या दृष्टीने सामाजिक उणिवा दूर करून, समाजातल्या प्रत्येक घटकांच्या जाणीवा जपणं आवश्यक आहे. अलीकडच्या काही दिवसांपासून कुटुंबविघटनानंतर आता व्यक्ती विघटन व्हायला लागलं आहे.

समाजाशी आपली नाळ जोडलेली असणं आवश्यक असतं, आपलं एक निराळं नातं इतर प्रत्येकाशी निर्माण झालेलं असणं गरजेचं असतं. बालपणापासूनच सामाजिक जिव्हाळ्याची सवय झाली कि पुढील आयुष्यांत समाजाप्रती आपलं कर्तव्य म्हणून जबाबदारीने सामाजिक घटकांच्या उणिवा दूर करण्यात आपला मोलाचा वाटा असू शकतो. लहान मुलांना निश्चितच तळहातावरील फोडासारखं वाढवायचं असतं. त्याच अनुषंगाने त्यांचं संगोपन, पालनपोषण करायचं असतं.

व्यक्ती तितक्या प्रकृती ह्या उक्तीप्रमाणे आणि निसर्ग नियमानुसार प्रत्येक बाळाची शारीरिक जडणघडण भिन्न असते. त्यांतही मुलगा आणि मुलगी हा जरी भेदभाव करायचा नसला तरीही त्यांना वाढवताना त्यांच्या शरीरांतर्गत होणारे बदल हे वेळीच विचारांत घ्यावे लागत असतात. त्या बदलांचा थेट परिणाम सर्वप्रथम त्यांच्या मानसिकतेवर होत असल्याचं आपल्या वेळोवेळी लक्षात आलंच पाहिजे. बालपणाशी संबंधित आपण आपला थोडा दृष्टीकोन बदलण्याची सद्य:स्थितीत नितांत गरज आहे. आपल्या सकारात्मक विचारांमुळे लहानपणातलं बालपण टिकवून ठेवणं आपल्याच विचार, वर्तन आणि व्यवहारांत आहे.

– विद्यावाचस्पती विद्यानंद

Email: vidyavachaspati.vidyanand@gmail.com

Avatar
About विद्यावाचस्पती विद्यानंद 32 Articles
शिक्षण तज्ज्ञ, जेष्ठ पत्रकार, लेखक, साहित्यिक, व्याख्याते, स्तंभ लेखक, कवी, व्याख्याते, अभिनेते, मानसशास्त्रीय समुपदेशक, करिअर आणि आध्यात्मिक मार्गदर्शक. एकूण १८ पुस्तकांचे लेखन (पैकी ६ क्रमिक पाठ्य पुस्तके गेल्या ६ वर्षांपासून विद्यापीठातील अभ्यासक्रमासाठी उपलब्ध), २००० पेक्षा अधिक लेखांना विविध माध्यमांतून प्रसिद्धी, ३० वर्षे शैक्षणिक क्षेत्रांत प्राध्यापक, प्राचार्य आणि संचालक म्हणून योगदान, ३५ वर्षे वैविध्यपूर्ण व्यवसायातील अनुभव, निरनिराळ्या विद्याशाखांमधून एकूण २८ पदवी व पदव्योत्तर शिक्षण तसेच २ विषयांमध्ये पी. एच. डी. (मानसशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र), सद्यस्थितीत तिसऱ्या पी. एच. डी. चे (आध्यात्म विषयांत) काम सुरु.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..