नवीन लेखन...

सकारात्मक सहजीवन

आपल्याला आयुष्य जगण्यासाठी सद्य:स्थितीत पैसाच लागतो, पण जीवन आजमावण्यासाठी कोणाचीतरी साथ, सोबत, संगत लागत असते. “तुझं माझं जमेना, पण तुझ्याविना करमेना”, अशी स्थिती असली तरीही आपल्याला मान्य होतं. आपल्यापैकी प्रत्येकाला सहजीवनाची गरज भासतेच. कदाचित, प्रत्येकाची तशी मानसिकता आयुष्यातील निरनिराळ्या टप्प्यांवर येत असेल.

अर्थात, प्रत्येकाच्या मानसिक पातळींवर होत असलेल्या निरनिराळ्या स्थित्यंतरांवर ही गरज कमी-अधिक होत असेल. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक अथवा शारीरिकदृष्ट्या जरी एकटं आयुष्य जगणं एखाद्यानं पसंत केलं अथवा स्वीकारलं तरीही त्याला मानसिकदृष्ट्या काहीवेळा, काहीबाबतीत जाणवणारा एकलेपणा मात्र आंतरिक अस्वस्थता निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो, मानसिक ताण-तणावाचा अनाकलनीय दबाव उत्पन्न होत राहतो.

प्रत्येक व्यक्तीला सहजीवनाची गरज, ही मानसिक पातळीवर अधिक आवश्यक असते. सहजीवनाच्या प्रवासाचा तेव्हाच प्रयास वाटत नाही, जेव्हा सकारात्मक दृष्टीकोनातून तो केला जात असतो. आपल्या सुख-दु:खांत, आयुष्यातील चढ-उतरांत सह-प्रवासी देखील आपली साथ-सोबत करणारा असणं योग्य ठरतं. ती साथ-सोबत देखील “जीवन के साथ भी; जीवन के बाद भी”, अशीच असणं अभिप्रेत असतं.

सकारात्मक सहजीवन जगता येणं ही केवळ कला नसून ते एक शास्त्र आहे, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. ह्या शास्त्रात संवाद, सहवास, सहभाग, सहकार आणि सम-भोग या बाबींचा कृतीशील विचार करावा लागतो, त्यांचा अंगीकार करणं आवश्यक ठरतं.

सहजीवन सकारात्मक आणि आनंदी करण्यासाठी साथ-सोबत करणाऱ्या प्रत्येकानं कर्तव्यापोटी स्वीकारलेली जबाबदारी समसमान घेतलेली असणं अभिप्रेत आणि अपेक्षित असतं. तशी जाणीव होणं महत्वाचं ठरतं.

– विद्यावाचस्पती विद्यानंद

ईमेल : vidyavachaspati.vidyanand@gmail.com

Avatar
About विद्यावाचस्पती विद्यानंद 32 Articles
शिक्षण तज्ज्ञ, जेष्ठ पत्रकार, लेखक, साहित्यिक, व्याख्याते, स्तंभ लेखक, कवी, व्याख्याते, अभिनेते, मानसशास्त्रीय समुपदेशक, करिअर आणि आध्यात्मिक मार्गदर्शक. एकूण १८ पुस्तकांचे लेखन (पैकी ६ क्रमिक पाठ्य पुस्तके गेल्या ६ वर्षांपासून विद्यापीठातील अभ्यासक्रमासाठी उपलब्ध), २००० पेक्षा अधिक लेखांना विविध माध्यमांतून प्रसिद्धी, ३० वर्षे शैक्षणिक क्षेत्रांत प्राध्यापक, प्राचार्य आणि संचालक म्हणून योगदान, ३५ वर्षे वैविध्यपूर्ण व्यवसायातील अनुभव, निरनिराळ्या विद्याशाखांमधून एकूण २८ पदवी व पदव्योत्तर शिक्षण तसेच २ विषयांमध्ये पी. एच. डी. (मानसशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र), सद्यस्थितीत तिसऱ्या पी. एच. डी. चे (आध्यात्म विषयांत) काम सुरु.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..