नवीन लेखन...

सगळं काही थांबू शकतं

सगळं काही थांबू शकतं
पण मन थांबत नाही,
किती आवरायचं म्हणलं
तरी मन सावरत नाही..
विसरायचं सार सहज म्हणलं
तरी मनाला कळतं नाही,
गुंतायचं नाही म्हणलं तरी
मनाच गुंतण सुटतं नाही..
कितीक समजावे बुद्धीने
परी मनापुढे बुद्धी चालतं नाही,
मोह अंतरीचे सोडायचे मोहक
तरी मनाला काही ते कळतं नाही..
द्वंद अनेक चालती अलगद अंतरी
परी मन ओढाळ वेल्हाळ होते,
सगळेच प्रयत्न फसतात मनासमोर
अन प्रश्न समोर उरतात निःशब्द अनेक..
मधुर मनाचे खेळ सारे मनस्वी
न मला आता काही कळते,
मी केव्हाच सोडले तुझ्यात प्रश्न
तुझे मन न अलवार कधी गुंतले..
फरक दोघांत हा मन खेळाचा
हरले मी अन हलकेच मन गुंतले,
मनाच्यापुढे न चाले कधी काही गणित
तुला न माझ्या मनीचे भाव अलवार कळले..

— स्वाती ठोंबरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..