नवीन लेखन...

तरंग पहिला-पार्श्वभूमी

होतो वाचुनि, ऐकुनि गुणगान विलायतेचे,

धूसर होते, स्वप्न मनीं, परदेश-गमनाचे ।
खुले पणाचेहोता, बाळगणे, ध्यास हा उराशी,
घडल्या विदेश वार्‍या, कल्पना नसतां कशाची ।
कल्पना नसतां कशाची ।।१।।
विशाल देशीं, भव्य प्रदेशी, दिसे अतिभव्यता,
गोष्टींतुनि सार्‍या, भव्य तेवुनि, दिसे दिव्यता ।
सारेंच येंथे, अपुल्या कल्पना – विश्वापल्याडचे
काम अपुल्या मुखास, करणे कौतुक तयांचे ।
करणे कौतुक तयांचे ।।२।।
घडी संस्कारांची, अवघड ती उमगण्या,
व्यर्थ नि अर्थहीन, यत्न अपुले, ती उलगडण्या ।
रुचेल मनांस, ते अलगद, प्रेमे उचलावे,
अचकट-विचकट, देखुनि, न च दचकावे ।
देखुनि, न च दचकावे ।।३।।
तरुणाईच्या चापल्याचा, आवेग आगळा,
सळसळणार्‍या रक्तगटाचा आवेश वेगळा ।
नव्हते वेळीं अमुच्या, वातावरण पोषक तैसे,
खंत ऐसी मनीं वसतां, सरणार जीवन कैसे ।
सरणार अपुले, सरणार, जीवन कैसे ।।४।।
ज्याने त्याने आयु जगावे, नियती आधारे,
क्षणा क्षणाचे हेम करावे, अपुल्या प्रज्ञेने ।
ते न जमतां, गुणी जनांचे कौतुक करावे,
न साधतां ते ही, स्व-नशीबे, रडत बसावे ।
स्व-नशीबे, रडत बसावे ।।५।।
हे न मिळाले, ते न मिळाले, न गावे रडगाणे,
हा घोर उणेपणाचा करी अवघड आयु जगणे ।
नयनीं उघड्या, मौजेत सारे, टिपुनि घ्यावे ।
परी, सुप्त लोचनीं, मंगल ते अंतरी ध्यावे ।
मंगल ते अंतरी ध्यावे ।।६।।
हातुनि जे निसटले, ते सारे, विसरुनि जावे,
मिळाले जे यत्ने, अपुल्याच भाग्याचे समजावे ।
प्राप्त सारे, स्वीकारुनि, मानावी कृपा ईश्वराची,
असावे नीट ध्यानीं, शांती मनाची, ठेव सुखाची ।
शांती मनाची, ठेव सुखाची ।।७।।
ठेविले ईशाने, तैसेचि, खुषिंत मस्त रहावे,
जे जे कधी न मिळणे, ते सारे, विसरुनि जावे ।
राहुनि खुषींत, पडणारे पदरीं, पाहुनि घ्यावे,
न जमले तर, खिन्न वदनें, कुढत बसावे ।
कुढत बसावे ।।८।।

— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास

Avatar
About सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास 43 Articles
श्री. सुरेश नाईक हे एक उत्तम कवी आणि प्रवासवर्णनकार आहेत. त्यांनी अनेक प्रवासवर्णने पद्यस्वरुपात लिहिली आहेत. ते “गुरुदास” या टोपणनावानेही लेखन करतात. भारतीय नौकानयन महामंडळातून निवृत्त अधिकारी. मराठी / हिंदी / इंग्रजी भाषांचा व्यासंग. काव्य गायनाचे/काव्य वाचनाचे शेकडो कार्यक्रम केले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..