नवीन लेखन...

उर्दूतले नामवंत लेखक – के.ए.अब्बास

ख्वाजा अहमद अब्बास उर्फ के. ए.अब्बास हे हाडाचे पत्रकार होते. उर्दूतले नामवंत लेखक आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण निर्माते-दिग्दर्शक कथा-पटकथाकार के. ए.अब्बास यांचा जन्म ७ जून १९१४ रोजी पानीपत, हरियाणा येथे झाला. त्यांनी ४६ वर्षे ‘लास्ट पेज’ हा स्तंभ सुरुवातीला ‘बॉम्बे क्रॉनिकल’ व नंतर ‘ब्लिटज’मध्ये लिहिला. राज कपूर यांचे व आर. के. फिल्म्सचे लाडके लेखक कथा-पटकथाकार म्हणून के.ए.अब्बास यांची ओळख होती. १९५१ साली ‘आवारा’ या सिनेमाची पटकथा आणि संवाद अब्बास यांची होते. पुढे अब्बास यांनी श्री ४२०’, ‘जागते रहो’, मेरा नाम जोकर, बॉबी चित्रपटाच्या पटकथा लिहिल्या होत्या. आपल्या पटकथांनी एक वेगळा विचार मांडणारे आणि समाजातील विषमतेला अधोरेखित करणारी स्वतंत्र शैली त्यांनी निर्माण केली. के. ए.अब्बास यांनी शंभरच्या वर पुस्तकांचं त्यांनी लेखन केलं आहे.

व्ही.शांताराम यांचा ‘डॉ. कोटनीस की अमर कहाणी’ हा चित्रपट अब्बास यांच्या ‘And One Did Not Come Back’ च्या कथेवर बेतला होता. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या चित्रपट करियरची सुरवात ख्वाजा अहमद अब्बास यांच्या निर्देशनाखाली बनलेली सात हिंदुस्तानी मधल्या सात कलाकाराच्या पैकी एका कलाकाराच्या स्वरुपात केली होती. के. ए.अब्बास यांच्या शहर और सपना या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. भारत सरकारने १९६९ साली के. ए.अब्बास यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. के. ए.अब्बास यांचे इतर चित्रपट ‘धरती के लाल’, ‘शहर और सपना’, ‘दो बूंद पानी’, सात हिंदुस्तानी, नया संसार, नीचानगर, शहर और सपना, धरती के लाल, परदेसी. अभिनेता शाहिद कपूरचे ते पणजोबा होत. के. ए.अब्बास यांचे १ जून १९८७ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4233 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..