नवीन लेखन...

रात्र मिलनाची

मला वाटते आज नव्याने जगावे
तुझ्या धुंद डोळ्यात मिसळुनी जावे
पुन्हा एकदा ती मधूर रात्र यावी
मिठीत तुझ्यासवे विसावून जावी ।

पुन्हा आठवे मज ती रात्र मिलनाची
थंडगार वारा अन ती रात्र चांदण्यांची
तशी रात्र मिलनाची पुन्हा जागवावी
रात्र सरली तरी ना कुणा जाग यावी ।

विसरावे सर्व जग हे तु मज जवळी येता
ना कुठल्याही दुःखाची आठवण यावी
मिसळावेत श्र्वासात श्र्वास अपुले
ना भीती कुणाची कुणा ही स्मरावी ।।

— सुरेश काळे
मो.9860307752
सातारा.
१० आक्टोंबर २०१८

सुरेश गोपाळ काळे
About सुरेश गोपाळ काळे 48 Articles
मी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे "शब्दसूर" हा काव्यसंग्रह प्रकाशित.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..