नवीन लेखन...

रस्त्यावरचा गोंधळ

भारतातील कुठल्याही शहरातील कुठल्याही ट्राफिक सिग्नल जवळ दिसणारे चित्र हा देश किती मागासलेला आहे याचे एक उदाहरण आहे. दोन लेनचा रस्ता असो वा तीन लेनचा, सिग्नल जवळ त्याच्या सहा-सहा लेन कशा होतात. अत्यंत सुशिक्षित वाटणारे लोक जेव्हा आपल्या गाड्या लेनची शिस्त मोडून पुढे घुसवण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी डोक्याला हात लावावासा वाटतो.

न्यूयॉर्क सारख्या शहरात ४ जुलैला लाखो गाड्या फटाक्याची आतषबाजी पाहायला रस्त्यावर येतात. पण कुणीही लेन कटिंग, आपली गाडी पुढे दामटवण्याचा प्रयत्न करीत नाही हे मी अनुभवले आहे. त्या गाड्यांमध्ये भारतीयांच्या गाड्या सुद्धा असतात.

ज्या देशात सार्वजनिक ठिकाणी लोकांनी कसे वागायचे ह्याचे प्रशिक्षण देण्याची खूप गरज आहे त्या देशात स्मार्ट सिटी प्रकल्प आणणे हे पैशाचा अपव्यय करणारे ठरेल.

RTO, पोलिस आणि महापालिकेचा कारभार प्रथम सक्षम करा. सार्वजनिक ठिकाणी गैर वागणा-या व्यक्तीस मग ती कितीही मोठी असो, तत्काळ शिक्षा होण्यासाठी कायदे कडक करा. सिटी आपोआप स्मार्ट दिसेल !

नव्या मुंबईमधील रेल्वे स्टेशनला काय अवकळा आली आहे ते जाऊन पहा. सुरवातीला जेव्हा हि स्टेशन बांधली तेव्हा उर आभिमानाने भरून आला होता. परंतु आता मात्र स्टेशन आणि त्याच्या आसपासचा परिसर पाहून दुखः होते.

काळाच्या कसोटीवर आगरकर खरे ठरले हेच याच वरून सिद्ध होते. ठाणे महानगरपालिकेचे रस्ते एकदा रात्री ३- ४ वाजता जाऊन पहा. इतक्या सुंदर शहरात राहतोय याचे अप्रूप वाटेल. पण मग दिवसा या रस्त्यांना अवकळा कोण आणतो? आपणच ना?

जो पर्यंत लोकां मध्ये स्वयंशिस्त येत नाही तो पर्यंत सिटी स्मार्ट होणे शक्य नाही.

— चिंतामणी कारखानीस

चिंतामणी कारखानीस
About चिंतामणी कारखानीस 75 Articles
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..