नवीन लेखन...

राज विराज

प्रभू रामाच्या पूण्यभूमिवरी सुखद काळ आला,
शुभ समयाला, देऊ या, आशिष विराज बाळाला,
देऊ या, आशिष विराज बाळाला, ।।

अन्
एक मुखाने म्हणूया सारे,
कुर्यात् बटोऽर्मंगलम् ।
कुर्यात् बटोऽर्मंगलम् ।।धृ।।क्षणांमागुनि क्षण हे सरता, वर्षे ही लोटली,
हळू हळू अंतर्यामी, पुत्र-प्रीत, फुलून आली ।
माय-पित्याच्या मनांत असते, प्रीत ती भाबडी,
पुत्रा योगे आली हांसत, ही आनंदाची घडी ।।
मधुराजाच्या पुष्पवाटिकीं क्षण सौख्याचा आला ।।१।।

जीव लावूनि बाळा वस्ती, सर्व स्वचि अर्पिले,
ईशापाशी, सदा तयाचे, मंगल ते प्रार्थिले ।
अविरत यत्नीं, आयुअमुचे, मधुगंधे फुलले,
माय-बापची अम्हां, ते ईश सम भासले ।।
श्री रेणु-प्रसादें, दिन मंगल हा आज उदेला ।।२।।

स्वागत करण्या, जयु राजाने, कंबर ही कसली,
साथीस अर्पू असतां, कुणा उणीव न कसली ।
अंतरी तयांच्या, प्रीती-दरवळ, आहे असली,
आपुलकीची गोऽड, ओऽढ, ही मनांत ठसली ।।
ऐसा नवनवलाईचा, भव्य सोहळा, इथे रंगला ।।३।।

-गुरुदास / सुरेश नाईक

— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास

Avatar
About सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास 43 Articles
श्री. सुरेश नाईक हे एक उत्तम कवी आणि प्रवासवर्णनकार आहेत. त्यांनी अनेक प्रवासवर्णने पद्यस्वरुपात लिहिली आहेत. ते “गुरुदास” या टोपणनावानेही लेखन करतात. भारतीय नौकानयन महामंडळातून निवृत्त अधिकारी. मराठी / हिंदी / इंग्रजी भाषांचा व्यासंग. काव्य गायनाचे/काव्य वाचनाचे शेकडो कार्यक्रम केले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..