नवीन लेखन...

निर्माते, दिग्दर्शक कमलाकर तोरणे

निर्माते, दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९२५ रोजी बेळगाव येथे झाला.

कमलाकर विष्णू तोरणे यांचे मूळ घराणे कोकणातील वेंगुर्ला येथील. लहानपणी डॉक्टर व्हायचे ठरवलेले असल्यामुळे त्यांनी बी.एस्सी.ची पदवी मिळवली. परंतु चित्रपट व कला यांवर प्रेम असल्यामुळे त्यांनी चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला. भालजी पेंढारकर हे त्यांचे गुरू. ‘महारथी कर्ण’ या चित्रपटात त्यांनी अभिनयही केला होता. ‘हिरवा चुडा’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट.

१९६६ मध्ये कमलाकर तोरणे यांनी पद्मा चव्हाण या अभिनेत्रीसोबत विवाह केला. १९७५ मध्ये त्यांनी ‘प्रेम चित्र’ नावाची स्वत:ची संस्था स्थापन केली. चित्रपट निर्माता व दिग्दर्शक म्हणून त्यांनी ‘आम्ही जातो आमच्या गावा’ हा पहिला चित्रपट काढला. या संस्थेअंतर्गत त्यांनी रवींद्र महाजनी, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, रुही बेर्डे यांसारख्या कलाकारांना चित्रपटात काम करण्याची संधी दिली.

‘थोरली जाऊ’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘भैरू पैलवान की जय’, ‘आई पाहिजे’, ‘आम्ही दोघे राजा राणी’, ‘आराम हराम आहे’, ‘लाखात अशी देखणी’ हे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले.कौटुंबिक कथानक, भावस्पर्शी प्रसंगी, उत्तम संगीत आणि कलाकारांकडून दर्जेदार अभिनय काढून घेणारे दिग्दर्शक अशी त्यांची ओळख होती.

कमलाकर तोरणे यांच्या ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ (१९६८), ‘थोरली जाऊ’ (१९८२) या चित्रपटांना उत्कृष्ट चित्रपटांचे पुरस्कार लाभले. तसेच ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ आणि ‘भैरू पैलवान की जय’ या चित्रपटांसाठी १९७६ आणि १९७७ अशी लागोपाठ दोन वर्षे महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता.

दूरदर्शनची पहिली मालिका ‘नस्ती आङ्गत’ ही कमलाकर तोरणे यांनी काढलेली होती.

हिंदीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत असताना अचानक मेंदूत रक्तस्राव होऊन कमलाकर तोरणे यांचे ९ एप्रिल १९९० रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..