नवीन लेखन...

प्रत्येकाची आनंदाची व्याख्या निराळी

आपण अनेकदा घडून गेलेल्या घडामोडी आणि घटना ह्यांच्यातच गुरफटलेले असतो. त्या लवकर विसरत नाहीत. त्यांतही नकारात्मक गोष्टी आपल्याला अधिकच सतावत राहतात, दु:खी करतात. आपल्या विचारांत सकारात्मकता आणल्याने येणारा अनुभव आणि त्याद्वारे मिळणारा आनंद निश्चितच आंतरिक समाधान आणि मानसिक शांती देणारा असतो.

प्रत्येक बाबीकडे खिलाडू वृत्तीनं बघितलं, आनंदानं प्राप्त परिस्थितीचा स्वीकार केला तर आपल्या जीवनशैलीत नक्कीच बदल घडून येऊ शकतात. हे अनुभवण्यासाठी चांगल्या माणसांची एक साखळी तयार करण्याचा आपला नेहेमी प्रयत्न असावा. अर्थात त्यामुळे आपण नेहमीच भेटू अगर न भेटू परंतू आपले चांगले विचार नक्कीच एकमेकांपर्यंत पोहोचत राहू शकतात.

आपल्या व्यक्त होण्याचा संबंध आपल्या मनाशी असतो तसंच एका व्यक्तीच्या अंतरंगाचा संबंध त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींच्या अंतर्मनाशी असतो. त्यांचं परस्परांमध्ये एक निराळं नातं असतं.

चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात – मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही. ह्या सकारात्मक विचारांचा उपयोग आपल्याला होत राहतो. जेवणातल्या मीठाप्रमाणे जीवनात चव आणणाऱ्यांपैकी आणि जीवनाची गोडी वाढवणाऱ्यापैकी आपण एक असावं आणि आपल्या जीवनाला सार्थकता प्राप्त करून घ्यावी, असा सकारात्मक विचार प्रत्येकानं करायला सुरुवात केली तर एकूणच वातावरणात सकारात्मकता, जाज्वल्य, आश्वासकता निर्माण झाल्याची प्रचीती येऊ लागते.

दैनंदिन जीवनांत आपण काहीतरी शोधत असतो. हा शोध नेमका कशाचा असतो ह्याचा अंदाज काहीवेळा येत नाही. खरं तर हा शोध आनंद प्राप्तीचा असतो. प्रत्येकाची आनंदाची व्याख्या जशी निराळी असते, तशीच अनुभूती देखील वेगवेगळी असते. आपापल्या अनुभूती आणि प्रचीतीनुसार आपली आनंदाची व्याख्या तयार होत असते. आनंद आपल्या अंतरंगात निर्माण होत असतो.

– विद्यावाचस्पती विद्यानंद

ईमेल : vidyavachaspati.vidyanand@gmail.com

Avatar
About विद्यावाचस्पती विद्यानंद 32 Articles
शिक्षण तज्ज्ञ, जेष्ठ पत्रकार, लेखक, साहित्यिक, व्याख्याते, स्तंभ लेखक, कवी, व्याख्याते, अभिनेते, मानसशास्त्रीय समुपदेशक, करिअर आणि आध्यात्मिक मार्गदर्शक. एकूण १८ पुस्तकांचे लेखन (पैकी ६ क्रमिक पाठ्य पुस्तके गेल्या ६ वर्षांपासून विद्यापीठातील अभ्यासक्रमासाठी उपलब्ध), २००० पेक्षा अधिक लेखांना विविध माध्यमांतून प्रसिद्धी, ३० वर्षे शैक्षणिक क्षेत्रांत प्राध्यापक, प्राचार्य आणि संचालक म्हणून योगदान, ३५ वर्षे वैविध्यपूर्ण व्यवसायातील अनुभव, निरनिराळ्या विद्याशाखांमधून एकूण २८ पदवी व पदव्योत्तर शिक्षण तसेच २ विषयांमध्ये पी. एच. डी. (मानसशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र), सद्यस्थितीत तिसऱ्या पी. एच. डी. चे (आध्यात्म विषयांत) काम सुरु.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..