नवीन लेखन...

नाहीच जमलं रे

नाहीच जमलं रे
तुला हलकेच विसरायला
भाव मनातला हळवा
खोडून मिटून टाकायला
नाहीच जमलं रे
मिठीतल्या भावनेला खोडायला
मोह तुझ्या गोड मिठीचा
नाहीच जमला पुसायला
नाहीच जमलं रे
तुझ्यात गुंतून बाहेर यायला
ओढ तुझी अलवार
तुझा विरह अबोल मिटायला
नाहीच जमलं रे
तुझ्यासारखे मला तोडायला
गुंतून गेले तुझ्यात
आल्हाद तुझ्या जाणिवा तुटायला
नाहीच जमलं रे
तुझी आठवण पुसायला
विसरुन जावे कसे भाव
तुझ्यात मोहरल्या भावना
नाहीच जमलं रे
मला दूर अलगद जायला
व्याकुळ होते तुझी आठवण
कळणार न तुला माझ्या वेदना
नाहीच जमलं रे
गुंतले मन तुटायला
मी व्याकुळ आठवणीत तुझ्या
चंद्रासवे एकाकी विरल्या जाणिवा
— स्वाती ठोंबरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..