नवीन लेखन...

मृगया

जीव काढून घ्यायचा
आणि विचारायचं जिवंत आहेस का…?
किती सोयीस्कर बदलतोस
भूमिका तुझी…?
बेफाम वादळात…
शिड म्हणून वापरायचं
आणि म्हणायचं तुटते आहेस का…?
किती ग्राह्य धरायचं तुला…?
अग्नी पंखांची भरारी व्हायची मी
आणि म्हणायचं माझ्यासाठी
फडफडशील का…?
सुंदर अविष्काराचं चिञ व्हायचं…
आणि म्हणायचं भावनांचे रंग
भरशील का…?
वास्तवाच्या तप्त अग्नीत झोकायचं
आणि म्हणायचं सोसशील का…?
एकतानतेत तू नहायचंस
आणि म्हणायचं अहीर भैरव
होशील का…?
सावज केलंस माझं…
आता मी विचारते….
मृगया माझी केलीसच का….?

©लीना राजीव.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..