नवीन लेखन...

कुठल्या वाटेवर या

कुठल्या वाटेवर या
पाऊल अलगद पडते
ही वाट कुठे हरवून
अनामिक मग होते..
फुलतील फुलांचे मळे
फुलपाखरे फुलात बागडे
गंधित मन होईल अलगद
सुवास अंतरी मोहक दाटे..
ही वाट अशी मग चालता
रमते क्षणभर मन हसरे बावरे
पाहूनी निसर्ग फुलतील गात्रे
नयनी साठविते हे फुलांचे ताटवे..
किती किती मन हरखून जाई
सुखद क्षण आनंद हृदयात भावे
मोहरुन जाईल अबोल काया
चुंबीता फुलास भुंगा कळी ती लाजे
हरवते या वाटेवर पाऊल माझे
किती रंगुन जाईल मनाचे धागे
उरतील पाऊलखुणा या वाटेवरती
ते धागे असतील धुंद रेशमी लडीचे..
फुलतील फुले मोहक सारे
फुलांचे गालिचे अलगद अंथरले
मन तृषांत अधिर आल्हाद ओथंबले
फुलात गंधाळून लाजले फुलपाखरे..
— स्वाती ठोंबरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..