नवीन लेखन...

कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणजे एक आनंदयात्री !

अगदी ढोबळ मानाने पाहिले तर व्यंगचित्रा ( cartoon ) मध्ये एखाद्या व्यक्तीमधील न्यून अधिक प्रकर्षाने दाखविले जाते तर व्यक्तिचित्रा ( portrait ) मध्ये चांगल्या गोष्टी प्रामुख्याने दाखविल्या जातात आणि एखादे न्यून असलेच तरी ते दुय्यम ठरते. तर अर्कचित्रात ( caricature ) मुख्य वैशिष्ठ्ये अधोरेखित केली जातात.

मराठीतील काही कवींच्या कवितांची अर्कचित्रे काढण्याचा हा प्रयत्न आहे. या कविता मी त्या त्या कवीच्या शक्य तितक्या वैशिष्ठ्यांसह, त्या त्यांच्याच आहेत असे वाटावे अशा पद्धतीने रचल्या आहेत. या सर्व अत्यंत थोर कवींची क्षमा मागून हा प्रयत्न आपल्यापुढे मांडतो आहे.आपल्याला हा माझा प्रयत्न आवडेल अशी अशा आहे.


दरवर्षी ते लिज्जत पापडवाल्यांना पावसावर एक छान कविता लिहून देत असत. पाऊसही असा रसिक की तो ही कविता त्यांच्या सहीनिशी प्रसिद्ध झाल्याशिवाय नीटपणे पडतच नसे . आता पाडगावकरच नाहीत. म्हणून त्यांची क्षमा मागून तशा प्रकारची एक कविता करण्याचा
मी प्रयत्न केलाय. बघू या,पावसाला आवडते का ? सोबत ही कविता देत आहे.
” पाऊस आला, पाऊस आला ” …..
1 पाडगावकरांचा -- पाऊस आ ला

तसेच अत्यंत सुंदर चालीत बांधता येतील अशी शेकडो गीते रचणाऱ्या पाडगावकरांची बोलगाणी म्हणजे एक आगळेच सौंदर्यलेणे !
शब्दांची शिस्त,व्याकरणाचे नियम वगैरेंच्या भानगडीत न पडता एका वेगळ्याच मुक्त वळणाने विषय थेट मांडण्याची ही एक शब्दधमाल.
पावसावरील त्याच प्रकाराने मी लिहिलेले हे एक बोलगाणे !
“रेन म्हणजे, रेन म्हणजे, रेस असतो….
2 पाडगावकरांचे बोलगाण े--रेन म्हणजे रेन असतो

Avatar
About मकरंद करंदीकर 43 Articles
मकरंद शांताराम करंदीकर यांनी बँक ऑफ इंडियातून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या अनेक छंदांना पूर्णपणे वाहून घेतले. गेली सुमारे ५० वर्षे ते दिव्यांचा - विशेषत: भारतीय दिव्यांचा संग्रह करीत आहे. त्यांच्याकडील हा संग्रह भारतातील दिव्यांचा सर्वात मोठा संग्रह आहे. या विक्रमासाठी त्यांचे नाव २ वर्षे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आणि एकदा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले आहे. याचबरोबर भांडी, बैठे खेळ, पत्ते, जुनी प्रसाधने, लेखन साहित्य असे इतर अनेक छंद त्यांनी जोपासले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..