नवीन लेखन...

कवीचे मन कळते का शब्दांना ?

कवीचे मन कळते का शब्दांना ?
का उगाच सांधली जाते मोट भावनांना!
कवी भाव कळतो का निसर्गाला ?
फुलांनाही सजवितो कवी कल्पनेत जरा..
मात्रा वृत्त छंदात कविता व्हावी बंदिस्त कशाला ?
शब्दांचा साज तो मनाला भुरळ पडावी अनेकदा,
कवी मोहरते भाव शब्दांत अलगद जेव्हा
हकलेच शब्द गुंफून जातात कवितेत तेव्हा..
कवी मनास छेडता कुणी कधी केव्हा!
काव्यांची सर बरसते व्याकुळ तेव्हा,
तोडतो मन पुरुष स्त्रीचे अलवार भाव गुंतता
कवितेचे भाव व्याकुळ बोचतात काटेरी मना..
असावी कविता सरळ साधी शब्द मोहात सदा!
निर्मळ निरागस सरितेसारखी वाहणारी शब्दमाला,
स्वातीचे मोती शिंपल्यात सर गुंफून सजता
हृदयस्थ काव्य हे स्वातीचे वाचा रसिकहो प्रेमाने जरा..
— स्वाती ठोंबरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..