नवीन लेखन...

सांधेदुखी – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

Joints Pain from the Perspective of Ayurveda

सांधेदुखी – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

वयाची पन्नाशी ओलांडली की किमान ५० % लोकांना सतावणारा आजार म्हणजे सांधेदुखी. अगदी लहान वयात होणारे सांध्यांचे विकारही बरेच आहेत पण अशा विकारांचे गांभीर्य विशेष नसते व ते खास औषधोपचार न करताही बरे होतात. तरुण वयात आणि उतार वयात होणारे सांध्यांचे विकार मात्र त्रासदायक ठरतात, आयुष्यभर सतावतात. सांधेदुखीची सविस्तर माहिती साध्या-सोप्या, कोणालाही समजेल-उमजेल अशा भाषेत ह्याठिकाणी आपल्यासाठी सादर करीत आहोत. ही माहिती फक्त औषधांबद्दलच नव्हे तर रोग, रोगाची कारणे, उपद्रव, संरक्षणाचे उपाय ह्यांसह  दैनंदिन व्यवहारात आहार, विहार, आचरण, सवयी ह्यांविषयी देखील आहे.

सांधेदुखी म्हणजे काय ? ती कशी होते ?

सांधेदुखीच्या अंतर्गत ‘संधिवात’ आणि ‘आमवात’ असे दोन मुख्य विकार आढळतात. सांधेदुखी साठी “संधिवात” हा शब्द व्यवहारात अगदी प्रचलित आहे. परंतु आमवात हा देखील महत्वाचा रोग आहे. “संधि” आणि “वात” असे दोन शब्द मिळून “संधिवात” हा एक सामासिक शब्द बनलेला आहे, तर “आम” आणि “वात” मिळून आमवात शब्द तयार झालेला आहे.

आयुर्वेदाने मनुष्याच्या वयाच्या दृष्टीने तीन गट केले आहेत. बाल वय हे कफाचे, तरुण वय पित्ताचे तर वार्धक्य हे वाताचे. त्यानुसार विशिष्ट वयोगटात होणारे रोग मुख्यतः त्या त्या दोषानुसार होत असतात. लहान वयात कफाचे रोग अधिक होतात, तारुण्यात पित्ताचे तर उतार वयात वात दोषाचे रोग अधिक होतात. आयुर्वेदाने मनुष्याच्या शरीराचे पण असेच तीन हिस्से केलेले आहेत. छातीपासून वरचा हिस्सा कफाचा, छातीपासून बेंबीपर्यंतचा भाग पित्ताचा तर बेंबीपासून खालचा हिस्सा वाताचा. त्यानुसार त्या त्या आजारांचे स्थान सुद्धा आपल्याला स्पष्ट दिसते.

कफ – पित्त – वात हे तीन दोष आहेत आणि त्या त्या दोषानुसार त्यांची स्वसंवेद्य तीन प्रमुख लक्षणे आहेत. कफाचे लक्षण ‘खाज’, पित्ताचे लक्षण ‘दाह किंवा आग’ तर वाताचे लक्षण आहे ‘वेदना’. ह्या सर्व बाबींचा विचार करता संधिवात हा उतार वयात होणारा आणि कंबरेच्या खालच्या भागात वेदना निर्माण करणारा आजार आहे हे आपल्याला लक्षात येईल. आमवात मात्र अगदी लहान वयातही होऊ शकतो.

वास्तविक शरीरात सुमारे साडेतीनशे सांधे आहेत. मग सगळ्यात जास्त सांधेदुखी कंबरेच्या खालच्या भागातच का होते असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. शरीराचा सगळा भार ज्या सांध्यांवर पडतो ते सांधे लवकर दुखू लागतात हे त्याचे उत्तर. ही दुखणी सांध्यांच्याच ठिकाणी अधिक का होतात ह्याचेही कारण आयुर्वेदात नमूद केले आहे. “तत्रास्थिनि स्थितो वायुः पित्तं तु स्वेदरक्त्योः श्लेष्मा शेषेषु . . . ” म्हणजे वायु हाडांमध्ये असतो, पित्त घाम आणि रक्तात राहते तर कफ हा इतर सर्व धातूंमध्ये राहतो. म्हणूनच हाडांच्या सापळ्यात ज्या ठिकाणी सर्वाधिक भार येतो किंवा ताणयुक्त हालचाली होतात त्या ठिकाणी म्हणजेच सांध्यांच्या ठिकाणी हे रोग जास्त प्रमाणात होतात.

सांधेदुखीची कारणे ?

संधिवात आणि आमवात असे दोन मुख्य संधिविकार प्रत्यक्षात आढळतात हे आपण वर पाहिले. ह्या दोन्ही विकारात सांधेदुखी हे मुख्य लक्षण असते. संधिवातामध्ये विशिष्ट सांध्यात तर आमवातामध्ये मात्र सर्व शरीरात दोष उत्पन्न होतात. संधिवात हा मुख्यतः वात दोषाच्या वैषम्यामुळे उत्पन्न होतो तर आमवात मात्र अनेक दोषांच्या बिघाडामुळे निर्माण होतो. उतार वयामुळे होणारी वाताची विकृत वाढ, त्यात अस्थिसंधि म्हणजे वाताची अगदी हक्काची जागा, कुपथ्य, कमी व्यायाम, थंड पदार्थांचे अतिसेवन, वजन वाढणे, अनुवांशिकता अशा अनेक कारणांमुळे संधिवात होतो.

संधिवात –

सर्वांगैकांगरोगांश्च कुर्यात्स्नायुगतोsनिलः l हन्ति संधिगतः संधीन् शूलशोथौ करोति च ll . . . . माधवनिदान

स्नायूंच्या ठिकाणी प्रकोप पावलेला वायु, रुग्णात सर्वांग व एकांग रोग आणि संधीच्या ठिकाणी प्रकोप पावलेला वायु त्याचे सांधे निखळविणे, ताठवणे, शूल आणि सूज निर्माण करून संधिवात निर्माण करतात.

 आमवात

आमवात हा एक स्वतंत्र आणि गंभीर रोग आहे. त्यासाठी ‘आम’ म्हणजे काय व त्यामुळे आमवात कसा होतो हे समजणे आवश्यक आहे.

विरुद्धाहारचेष्टस्य मन्दाग्नेर्निश्चलस्य च l स्निग्धं भुक्तवतो ह्यन्नं व्यायामं कुर्वतस्तथा ll

वायुना प्रेरितो ह्यामः श्लेष्मस्थानं प्रधावति l तेनात्यर्थं विदग्धोऽसौ धमनीः प्रतिपद्यते ll

वातपित्तकफैर्भूयो दूषितः सोऽन्नजो रसः l स्रोतांस्यभिष्यन्दयति नानावर्णोऽतिपिच्छिलः ll

जनयत्याशु दौर्बल्यं गौरवं हृदयस्य च l व्याधीनामाश्रयो ह्येष आमसंज्ञोऽतिदारुणः ll . . . . माधवनिदान

चुकीचा आहार विहार, मंदाग्नि, अव्यायाम, पचायला जड व स्निग्ध अन्न सेवन करून लगेच व्यायाम करणे ह्या कारणांमुळे निर्माण होणारा एक विषसमान घटक म्हणजे ‘आम’. हा आम, वायुने प्रेरित होऊन कफ स्थानात जातो. पुढे तो आमाशयाच्या सूक्ष्म स्रोतसांमध्ये शिरून अन्नरस, वात, आणि कफ-पित्ताने दूषित होऊन स्रोतसांना भरून बुळबुळीत स्वरुपात व नाना रंगात प्रकट होतो. ही सर्व दूषित संरचना सांध्यांच्या ठिकाणी असलेल्या कफस्थानात (सायनोव्हियल कवचात) जाऊन स्थिर होते व गंभीर स्वरूपाचा आमवात नावाचा विकार होतो. आयुर्वेद वर्णित रोगाची ही संप्राप्ति समजायला नक्कीच कठीण आहे. थोडक्यात म्हणजे भूक नसतांना पचायला जड आणि स्निग्ध अन्न सेवन करून लगेच व्यायाम करण्यामुळे आमवात होण्याची भीती संभवते.

 वेदना आणि सूज – विशेष माहिती

थंडीने वेदना वाढते व शेकण्याने नियंत्रणात राहते. हॉट वॉटर बॅगचा किंवा शेकण्याच्या अन्य पद्धतींचा वापर पाठ किंवा कंबर शेकण्यासाठी आपण नेहमीच पाहतो. लवकर आराम पडण्यासाठी तेल लावून शेक घेण्याची पारंपारिक पद्धत नक्कीच शास्त्रीय आहे. भरपूर थंडीच्या ठिकाणी हातापायाला किंचितसा मार लागला तरी असह्य वेदना होतात पण तेवढाच मार उन्हाळ्याच्या दिवसात मात्र विशेष त्रासदायक वाटत नाही. कुठेही दुखापत झाल्यावर “ताबडतोब बर्फ लावावा” अशी सूचना डॉक्टर करतात. त्याचे कारणसुद्धा समजून घेऊया. मार लागल्यावर त्वचेखालच्या नाजुक रक्तवाहिन्या तुटतात व त्यातून रक्तस्राव सुरु होतो. हा रक्तस्राव त्वचेखालच्या जागेत साचू लागतो. तुटलेल्या रक्तवाहिन्या बर्फ लावण्यामुळे ताबडतोब आकुंचित होतात व रक्तस्राव कमी होतो. मार लागल्यावर  त्याठिकाणी आपोआप बाधीर्य येते, म्हणून वेदना वाढत नाहीत आणि रक्तस्तंभनही होते. परंतु सुजेवर बर्फ लावणे हा फक्त तात्पुरता इलाज आहे हे लक्षात ठेवावे. कालांतराने शेक देण्यानेच वेदना व सूज नियंत्रणात राहतात.

सुजेची ५ मुख्य लक्षणे –

  • स्थानिक उष्णता
  • लाली
  • वेदना
  • आकारात वाढ
  • हालचालीत अटकाव

सूज निर्माण होण्याची प्रक्रिया कशी घडते ?

शरीरात अॅराचिडोनिक अॅसिड नामक चरबी सदृश घटक असतो. सूज निर्मितीच्या प्रक्रियेत ह्यातील ऑक्सीडेटिव्ह प्रक्रिया वाढते. ह्यातून दोन मार्गाने सूजेची प्रक्रिया घडते. सायक्लो-ऑग्झिजिनेझ मार्गातून प्रोस्टाग्लॅंडिन्सची निर्मिती होते तर 5-लायपॉग्झिजिनेझ मधून ल्युकोट्राइन्सची निर्मिती होते. प्रोस्टाग्लॅंडिन्समध्ये अनेक रसायने असतात. त्यांच्या संयुक्त प्रभावाने रक्तवाहिन्यांचे विस्फारण होते, वेदनेची तीव्रता वाढते, परिणामी सूज, लाली, स्पर्शासहत्व ही लक्षणे उत्पन्न होतात. ल्युकोट्राइन्सपैकी LTB4 ह्या जातीच्या रसायनाने वेदनेच्या जागेवर पांढऱ्या पेशींचा संचय होऊन सूज वाढते. प्रोस्टाग्लॅंडिन्स व ल्युकोट्राइन्स ह्या घटकांना नियंत्रणात ठेवून सूजेची चिकित्सा करता येते.

सांधेदुखीची पूर्वलक्षणे-

संधिवातात हालचालीच्या वेळी सांध्यांमध्ये आवाज होणे, दीर्घकाळ एकाच सांध्यावर भार सहन न होणे अशी लक्षणे सुरुवातीला दिसतात. त्याकडे दुर्लक्ष केले तर रोग बळावतो व लक्षणे तीव्र होऊन वेदना वाढत जातात.

आमवातात अंग दुखते, अन्नावर रुची राहत नाही, खूप तहान लागते, आळस येतो, शरीर जड होते, ताप येतो, अन्नपचन व्यवस्थित होत नाही व सांध्यांवर सूज येते.

संधिवात – आमवात : दोहोंमधील भिन्नता

संधिवात आमवात
वार्धक्यात होणारा व वयानुसार अधिक बळावत जाणारा विकार. तरुण वयात सहसा काही दुखापती शिवाय होत नाही. अगदी लहान वयापासून केव्हाही रोगाची सुरुवात होऊ शकते. ३० ते ५० वयामध्ये अधिक संभवतो.
सांध्यांच्या मधली कूर्चा झिजते, हाडे एकमेकांवर घासली जातात व कर कर आवाज होऊन वेदना होते सांध्यांमधील सायनोव्हिअल कवचात दोष संचय होतो. कूर्चा मात्र शाबूत असते.
रोगाची सर्व लक्षणे व वेदना फक्त सांध्यांपुरतीच मर्यादित असतात. ताप, शरीरावर सर्वत्र सूज, हृदयात जडपणा, फुप्फुस विकार, डोळ्यांचे विकार अशी अनेक सार्वदेहिक लक्षणे होतात त्याशिवाय सांध्यांच्या ठिकाणी वेदना/सूज होतेच
गुडघे, कंबर, पाठीचे मणके अशा अधिक भार सोसणाऱ्या सांध्यांवर वेदना अधिक व सूज कमी असते हातापायांची बोटे, मनगटे अशा सांध्यांवर सूज, वेदना, स्थानिक उष्णता, लाली अशी लक्षणे होतात
वेदना आणि सूज क्रमशः वाढते मात्र विशिष्ट सांध्यांवर स्थिर असते, जागा बदलत नाही. सूज अदलून बदलून निरनिराळ्या तीस पर्यंत सांध्यांवर दिसते. लक्षणांचे गांभीर्य अचानकपणे कमी-अधिक होते
सांध्यांच्या आजूबाजूला हाडाच्या टोकाशी अणुकुचिदार अशी वाढ होते. त्याला ‘स्पर’ असे म्हणतात. चिकित्सेअभावी सांध्यांमध्ये वक्रता / व्यंग निर्माण होते.
त्वचेखाली गाठी (नोड्यूल्स) होत नाहीत. २० ते ३० % रुग्णांमध्ये त्वचेखाली गाठी (नोड्यूल्स) होतात.
स्त्री व पुरुषांमध्ये समान प्रमाणात होतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ३ पट अधिक प्रमाणात होतो.
लोकसंख्येच्या तुलनेत अधिक प्रमाणात आढळतो लोकसंख्येच्या तुलनेत प्रमाण अल्प असते
वार्धक्य, अनुवंशिकता, मुकामार, झीज, स्थौल्य, होर्मोन्स कमतरता, स्नायुदौर्बल्य अशी प्रमुख कारणे आढळतात. रोगप्रतिकारक्षमता कमतरतेमुळे सांध्यांच्या कवचावर आघात करणारा विकार (ऑटोइम्यून डिसीज)
सकाळी उठल्याबरोबर सांधे आखडल्याचे समजते पण थोड्याफार हालचालीनंतर सांधे मोकळे होतात. जास्त चाल झाल्यावर मात्र पुन्हा दुखू लागतात. सकाळी उठल्याबरोबर सांधे आखडल्याचे समजते व ही अवस्था दीर्घकाळ पर्यंत तशीच राहते.
सांध्यांमध्ये वेदना आणि सूज ह्याशिवाय अधिक लक्षणे दिसत नाहीत. सतत आजारी असल्याची भावना, मंद ताप, प्रचंड थकवा व स्नायूंमध्ये वेदना होत असतात. हृदयरोग व विशिष्ट प्रकारचे कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते.
आजार सांध्यांपुरताच मर्यादित असतो त्यामुळे वेदना सोडल्यास अन्य रोग होऊन आयुष्मान कमी होण्याची शक्यता नसते. सार्वदेहिक आजार असल्यामुळे आयुष्मान कमी होण्याची शक्यता असते

पथ्यापथ्य –

रोग होण्याच्या कारणांपासून दूर राहणे हाच पथ्यापथ्याचा खरा कानमंत्र. फक्त सांधेदुखी, संधिविकारातच नव्हे तर स्वास्थ्याच्या दृष्टीने एकूणच विचार केला तर आपल्याला एक गोष्ट स्पष्ट दिसेल की जाडजूड लोकांपेक्षा सडपातळ प्रकृतीचे लोक तुलनेने कमी आजारी असतात. त्यांना काही आजार झालाच तर लवकर आटोक्यात येतो, रोगाचे इतर उपद्रव अतिशय कमी प्रमाणात होतात, चिकित्साही जास्त काळ घ्यावी लागत नाही, त्यांचे आयुष्मान देखील तुलनेने अधिक असते. दोन घास जास्त खाण्यापेक्षा दोन घास कमी खाणे कधीही हितकर असते हे कायम स्मरणात ठेवावे. जाडजूड लोकांनी वजन नियंत्रणासाठी अक्षय निर्मित मेदमुक्ता टॅबलेट सेवन कराव्यात.

अतिव्यायामाने धातूंची झीज अधिक होते. त्यामुळे व्यायाम मर्यादित प्रमाणात पण अतिशय नियमितपणे करावा. शीतपेये, आईस्क्रीम्स ह्यांचे सेवन क्वचित व मर्यादित प्रमाणात करावे. फसव्या जाहिरातींच्या मोहात पडून बारा महिने तेरा काळ थंड पाणी / पेय घेण्यामुळे आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो. सूर्यनमस्कार व योगासने करण्याने शरीर पहेलवानासारखे जरी दिसले नाही तरी निरोगी मात्र नक्कीच राहते. निसर्गाने प्रत्येक सांध्याला एक नियोजित हालचाल रचली आहे. दिवसातून एकवेळा तरी ही हालचाल त्या त्या सांध्याकडून करून घ्यावी. ह्या हालचाली किती प्रकारे होऊ शकतात ते पहा –

  • शरीराच्या जवळ (फ्लेक्शन)
  • शरीरापासून दूर (एक्सटेन्शन)
  • शरीरापासून बाजूला घेणे (अॅब्डक्शन)
  • शरीराजवळ घेणे (अडॅक्शन)
  • सुलट्या दिशेने फिरवणे (क्लॉकवाईज रोटेशन)
  • उलट्या दिशेने फिरवणे (अॅंटिक्लॉकवाईज रोटेशन)
  • ताण देणे (ताठ बसण्यामुळे मणक्यांना सरळ रेषेत ठेवण्यासारखी क्रिया)

सदर हालचाली, व्यायाम व योगासने तज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय करू नयेत हे लक्षात ठेवावे

सांधेदुखी ची परिपूर्ण  चिकित्सा –

अक्षय उद्योग समूह गेली २५ वर्ष सातत्याने शास्त्रशुद्ध पद्धतीने औषध निर्मिती करण्यात अग्रस्थानी आहे. औषधी द्रव्यांची योग्य ओळख, निवड, सखोल अभ्यास, मानवी शरीरावर त्यांच्या परिणाम व दुष्परिणामांची सजग माहिती, औषधे अधिक गुणकारी होण्यासाठी विशेष विशेष प्रक्रिया अशा अनेक बाबींचा विचार करून औषध निर्मिती केली जाते. त्यामुळे अक्षय निर्मित उत्पादनांची गुणवत्ता नेहेमीच वरचढ असते. सांधेदुखीची यशस्वी चिकित्सा अक्षय निर्मित वातमुक्ता टॅबलेट व लिनिमेंट ह्या जोडीने उत्तम प्रकारे करता येते, तोंडावाटे औषधोपचार करून आणि स्थानिक उपचार करून. ही दोन्ही औषधे निर्धोक जरी असली तरी ह्यांचा वापर वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानेच करावा. चिकित्सा फलदायी होण्यासाठी ह्या औषधी पाठांतील प्रत्येक घटकद्रव्य कशाप्रकारे सहाय्यभूत होते ते आता पाहूया-

वातमुक्ता (टॅबलेट)

घटक द्रव्ये:

देवदार (Cedrus deodara), एरंडमूळ (Ricinus communis), अस्थिशृंखला (Cessus quadrangularis), शल्लकी निर्यास (Boswellia serrata), शुद्ध गुग्गुळ (Balsamodendron mukul), शुद्ध कुचला (Strychnous Nux-vomica)

देवदार : सूजनिर्मितीच्या प्रक्रियेत केंद्रबिंदु असलेले लायपॉग्झिजिनेझ स्राव रोखून सूज नियंत्रण करण्याचे प्रभावी कार्य देवदाराने होते. ह्याशिवाय उत्तम वेदनाशामक म्हणून ही वनस्पती स्वयंसिद्ध आहे.

 एरंडमूळ : डायक्लोफिनॅक सोडियम नामक वेदनाशामक औषध आधुनिक वैद्यक शास्त्रात प्रसिद्ध आहे. कोणतेही कारण असो, ह्या औषधाने तत्काळ वेदना थांबते. एरंडमुळाचा तौलनिक अभ्यास ह्या औषधाबरोबर केला असता ह्यातील वेदनाशामक गुण तुल्यबलअसल्याचे निदर्शनास आले. शिवाय अन्य उपद्रवही (साइड इफेकट्स) होत नाहीत. आयुर्वेदातही आमवाताच्या चिकित्सेत एरंडमूळ श्रेष्ठ असल्याचे वर्णन मिळते.

“आमवातगजेन्द्रस्य शरीरवनचारिणःl एक एव निहन्ताऽयमैरण्डस्नेहकेसरी ll”

अर्थ – आमवातरुपी गजेन्द्राचा नाश करणारा एकमेव सिंह म्हणजे एरंडस्नेह आहे.

अस्थिशृंखला : व्यायाम नेहमी अर्धशक्ति करावा असे आयुर्वेदात वर्णन आहे. आवाक्यापेक्षा जास्त व्यायाम केल्यामुळे हाडांतील सांध्यांची झीज होते व त्याठिकाणी सूज येते. व्यायामाबद्दलच्या चुकीच्या समजुतीने किंवा जलद वजन नियंत्रणाच्या अपेक्षेने काही तरुण मंडळी अघोरी व्यायाम करतात. अशा कारणामुळे झालेल्या सांधेदुखीवर अस्थिशृंखलेचा प्रयोग वेदनामुक्तिसाठी सर्वश्रेष्ठ ठरला आहे.

शल्लकी निर्यास : शल्लकी नावाच्या झाडापासून निघणाऱ्या डिंकाला ‘शल्लकी निर्यास’ म्हणतात. ह्यात बोसवेलिक अॅसिड नामक कार्यकारी घटक असतो. ह्यामुळे उत्तम वेदनानियंत्रण होते व सांध्यांच्या हालचाली अल्पकाळात पूर्ववत होतात असे सिद्ध झाले आहे. संधिवात व आमवात ह्या दोन्ही संधिविकारात उपयोगी ठरणारे हे मौल्यवान औषधी द्रव्य आहे. सूजनिर्मितीसाठी कारणीभूत असलेल्या ल्युकोट्राइन्सवर ह्याचे कार्य होते.

शुद्ध गुग्गुळ : केवळ सूजनियंत्रण नव्हे तर विशेषकरून सांध्यांच्या सुजेवर शुद्ध गुग्गुळ अतिशय उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. रक्तातील चरबी आणि वजन कमी करण्यासाठीसुद्धा गुग्गुळाचा उपयोग प्रसिद्ध आहेच. वजन वाढीमुळे सांध्यांवर पडणारा भार कमी करून ह्याचा दुहेरी फायदा होतो. सूजनिर्मिती करणाऱ्या प्रोस्टाग्लॅंडिन्सना आटोक्यात ठेवून ह्याची क्रिया होते.

शुद्ध कुचला : अत्यंत प्रभावशाली वेदनाशामक म्हणून हे द्रव्य कार्य करते. हे कार्य केवळ स्थानिक नव्हे तर केंद्रीय मज्जा यंत्रणेवरही होते ज्यामुळे वेदनेचे गांभीर्य त्वरित आटोक्यात येते. ह्याने रोगप्रतिकारक्षमताही सुधारते. म्हणून सार्वदेहिक दोषवैषम्य असलेल्या आमवतात देखील कुचला प्रभावी ठरतो.

वातमुक्ता (लिनिमेंट)

घटक द्रव्ये:

विषगर्भ तेल, महामाष तेल, नारायण तेल, गंधपुरा तेल

ह्या पाठातील सर्व घटक द्रव्ये हजारो वर्षांपासून वेदना, सूज नियंत्रण व संधिविकार चिकित्सा ह्यासाठी वैद्यवर्गाच्या कसोटीस उतरलेली आहेत. त्यांचे सुयोग्य मात्रेत मिश्रण करून लिनिमेंट स्वरुपात सादर केले आहे. हे संमिश्रण १०० % औषधि असून ह्यात कोणत्याही प्रकारचे पेट्रोलियम अथवा रसायन आधार द्रव्य म्हणून वापरलेले नाही. सिद्ध तेलांचे मिश्रण असल्यामुळे त्वचेतून पूर्णपणे शोषले जाते व दीर्घकाळ परिणामकारी ठरते.

विषगर्भ तेल : सांध्यांच्या सुजेवर अत्यंत गुणकारी असे हे तेल आहे. गृध्रसी (सायाटिका), डोकेदुखी, हाडांमध्ये वेदना, कानामध्ये आवाज (टिनिटस), मांसक्षय, खूप चालण्यामुळे होणारी अंगदुखी, पक्षाघात (पॅरालिसिस), हनुस्तंभ अशा सर्वप्रकारच्या वातरोगांवर गुणकारी आहे.

महामाष तेल : पक्षाघात (पॅरालिसिस), हनुस्तंभ, चेहऱ्याचा पॅरालिसिस (फेशियल पॅरालिसिस), मन्यास्तंभ, हनुस्तंभ, सांधे आखडणे, पाठीच्या व मानेच्या मणक्यांचे विकार (स्पॉन्डिलोसिस), मुकामार, आमवात व संधिवात, मांसक्षय, अशा विकारांमध्ये परम उपयोगी. ह्याचा विशेष उपयोग वार्धक्यात होणाऱ्या विविध वातविकारांवर उत्तम होतो.

नारायण तेल : लांबच्या प्रवासामुळे होणारी अंगदुखी, संधिवात, आमवात, वातरक्त (गाऊट), मणक्यांचे विकार (स्पॉन्डिलोसिस) व हाडांना बळकटी देण्यासाठी ह्याचा उपयोग होतो.

गंधपुरा तेल : हे पिवळसर सुगंधी तेल संधिविकार चिकित्सेसाठी जगप्रसिद्ध आहे. गंध थोडाफार निलगिरीप्रमाणे असतो. ह्यात मिथाइल सॅलिसिलेट नामक वेदनाशामक रसायन असते. हे तेल त्वचेवर लावल्याने शेकल्याप्रमाणे जाणवते व वेदना शमन करण्यास उपयुक्त ठरते.

वातमुक्ता कोणी घ्यावे?

तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा आधीच पाण्याची व्यवस्था करावी. सांधेदुखी पूर्वीची लक्षणे दिसू लागताच वातमुक्ता टॅबलेट मध्यम मात्रेत घेण्याची व लिनिमेंट वापरण्याची सुरुवात करावी. ह्याने “प्रिवेन्शन इज बेटर दॅन क्युअर” ही म्हण आपल्याला अंमलात आणता येईल व पुढे होणारे त्रास, उपद्रव आणि ऑपरेशन (नी रिप्लेस्मेंट / जॉइंट रिप्लेसमेंट) सारखे खर्चिक इलाज टाळता येतील. गर्भिणींनी उदरावर लावण्यासाठी व ६-७ वर्षाखालील मुले वगळून इतर सर्वांनी ह्या टॅबलेट व लिनिमेंटचा वापर सर्व प्रकारच्या वातविकरांसाठी डोळे झाकून करावा. वेदना, सूज, पाठदुखी, कंबरदुखी, खांदे आखडणे (फ्रोजन शोल्डर), सायाटिका किंवा अन्य कोणत्याही वातरोगापासून खऱ्या अर्थाने मुक्तता मिळवण्यासाठीच निर्माण केले आहे “वातमुक्ता, टॅबलेट व लिनिमेंट”.

सेवन विधी :

टॅबलेट : २ – २ टॅबलेट दोन वेळा रिकाम्यापोटी, कोमट पाण्याबरोबर

लिनिमेंट : वेदनेच्या ठिकाणी हलक्या हाताने मसाज व शेक, दिवसातून दोन वेळा

सावधगिरीचा इशारा : रिकाम्या पोटी टॅबलेट सेवनाने क्वचित प्रसंगी आम्लपित्त होण्याची शक्यता आहे. असे होत असल्यास टॅबलेट जेवणानंतर घ्याव्यात. लिनिमेंटचा वापर गर्भिणींनी करू नये. बाल वयात त्वचा सुकुमार असते म्हणून लिनिमेंटचा वापर टाळावा. त्वचारोग, त्वचेला भेगा असतील त्या ठिकाणी लिनिमेंट वापरू नये.

संदर्भसूची –

लेखक

वैद्य संतोष जळूकर

अक्षय फार्मा रेमेडीज, मुंबई

+917208777773

drjalukar@akshaypharma.com

 

Avatar
About डॉ. संतोष जळूकर 33 Articles
डॉ. संतोष जळूकर हे आयुर्वेदिक डॉक्टर असून ते आयुर्वेदिक औषधनिर्मितीच्या व्यवसायात आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..