नवीन लेखन...

जखम

खरंच रे वेड्या,तुला कळला नाही, माझ्या मनीचा भाव,
नकळत कोरून गेलास,न भरलेल्या जखमेचा घाव…
गळून पडेल का ही जखम? की जाईल ती पण सुखून,
की चीघळून जाईल पुन्हा,सोसेल का हे तळपतं ऊन?
तू दिली आहेस म्हणून खरंच का हिला जपून ठेवू?
सांगना,सजवून धजवून अंगावरचं टपोरं गोंदण मानून घेवू ?
मलम नाही रे हिला,असा कसा रे केलास वार?
उसळणाऱ्या तलवारीतही नव्हती,तुझ्या जिभे एवढी धार…
उफाळून आलंय बघ हे हृदय, स्वत:स मर्यादा घालून,
अश्रूंनाही ठेवतंय मुठीत, भावनांची करपलेली खपली सोलून…

— कु. श्र्वेता काशिनाथ संकपाळ.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..