नवीन लेखन...

नवा उपक्रम – चंदर – बालकुमार कादंबरी – प्रास्तविक

नमस्कार

” चंदर ” – या बाल-कादंबरीचे प्रकाशन शिक्षक दिनी – ०५- सप्टेंबर -१९९७ ला परभणीच्या नूतन विद्यालयात झाले .

मी बालसाहित्य लेखन सुरु केले १९९३ साली , बागुलबुवा आणि स्वावलंबन ” ही दोन गोष्टींची पुस्तके प्रकाशित 
झाली . मुलांसाठी किशोर कादंबरी लिहिणे ” हे माझे लेखन स्वप्न ..१९९७ साली पूर्ण झाले ..

जेष्ठ साहित्यीक श्री.बाबा भांड

सर यांच्या प्रोत्साहना मुळे ” चंदर ” ही किशोर कादंबरी लिहून झाली आणि भांडसरांच्या “साकेत प्रकाशन -औरंगाबाद “या नामवंत प्रकाशन संस्थेने माझी ही किशोर कादंबरी प्रकाशित केली .

एक ध्येयनिष्ठ गुरुजी आणि त्यांचा ध्येयवेडा विद्यार्थी ” यांच्या भावूक गुरु-शिष्य नात्याची कथा “म्हणजे “चंदर” हे या किशोर कादंबरीचे कथानक आहे.

आता मी पुण्यात आहे , पुण्यात माझ्या सोबत असलेले बडोदा अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष – प्रसिध्द साहित्यिक व निवृत्त सनदी अधिकारी -श्री.लक्ष्मीकांतजी देशमुख हे १९९७ साली परभणीला निवासी -उप-जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते .मीही  या काळात परभणीला होतो .त्याकाळातील आमची मैत्री आजही तशीच आहे .
त्या सहवासाची आठवण ..”चंदर” किशोर कादंबरीच्या निमित्ताने नेहमीच होते ..

– श्री.लक्ष्मीकांत देशमुख यांनी “चंदर “या किशोर कादंबरीला दिलेल्या शुभेच्छा कादंबरीच्या मलपृष्ठावर आहेत.
त्या अशा …

“ही कथा आहे एका अभ्यासू व संस्कारक्षम मुलाच्या धडपडीची . जिद्दीची आणि परिश्रमपूर्वक यश मिळवणाऱ्या बालकाची . एका छोटया गावाच्या विकासासाठी धडपडणाऱ्या गुरुजींची . ज्यांनी नवी पिढी घडविण्याचा वसा घेतला आहे.

आज समाजात विद्यार्थी जो उद्याचं भविष्य आहे – संस्कारहीन होत चालला आहे. त्याच्यापुढे चंगळवादाचे आदर्श आहेत- खूप पैसा कमावणे व मजा करणे , ” अशावेळी सामाजिक बांधिलकी मानणारे व त्यासाठी जीवन वेचणारे शिक्षक व सहजतेने ते संस्कार ग्रहण करून एक उत्तम विद्यार्थी व एक आदर्श नागरिक बनण्याचा प्रयत्न करणारा विद्यार्थी या कादंबरीद्वारे श्री.अरुण वि.देशपांडे यांनी संस्कारक्षम वयातील किशोर- युवा वाचकापुढे सादरकेले आहेत . त्यातील आदर्शवाद साधा सोपा , कसलीही आडवळणे नसलेल्या कथानकात सहजतेने येणारे मौलिक व जीवनोपयोगी विचार हे या कादंबरीचे मर्मस्थान आहे.

किशोर- युवा वाचकांना ही कादंबरीका वाचतांना त्यांच्यातल्याच एका धडपडणाऱ्या मुलाचं चित्रण असल्याचं आढळून येईल ,ते या कथानकाशी समरस होतील असा विस्वास वाटतो.

अतिशय सुबोध व रंजक कथनशैली . कथानायक चंदरने शिक्षण घेण्यासाठी उपसलेल्या धडपडीचे नेटक्या भाषेत आलेलं चरित्र – चित्रण व गुरुजींच्या रुपानं साकारलेला आदर्शवाद, यामुळे ही कादंबरी खर्या अर्थानं संस्कारक्षम झाली आहे.

करी जो रंजन मुलांचे |जडेल नाते प्रभुशी त्याचे |

ही उक्ती सार्थ करणारी आहे.

लक्ष्मीकांत देशमुख
(परभणी- १९९७ )

ही बालकुमार कादंबरी आपल्यासाठी – क्रमशः आरंभ करतो आहे, त्यासाठी शुभेच्छा व प्रतिसाद द्यावा ही विनंती.

— अरुण वि.देशपांडे
9850177342

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..