नवीन लेखन...

आपत्ती व धोके निवारण दिन

संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे दि. १३ ऑक्टोबर हा दिवस जागतिक स्तरावर आपत्ती धोके निवारण दिन (International Disaster Risk Reduction Day) म्हणुन साजरा करण्यात येतो.

आपत्ती व्यवस्थापन धोरणात आमूलाग्र बदल करणारी ही संकल्पना स्वीकारणे अनेक देशांपुढे आव्हान ठरले. या संकल्पनेमुळे ‘आपत्ती प्रतिसाद’ पेक्षा ‘आपत्ती आकुंचन’ यास महत्त्व आले. आपत्ती ओढवू नये तसेच आपत्तीमुळे होणारे परिणाम कमी करणे यासाठी उपाययोजना हा मुख्य केंद्रबिंदू ठरला. देशाच्या विकास आराखडा धोरणात व विकास नियमावलीत सुयोग्य बदल करणे, ही उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरली. त्याच बरोबरीने सर्व विकासास मानवी चेहरा मिळाला कारण सजीव प्राणी व वनस्पती हे विकासाचे केंद्रबिंदू असावेत असे जागतिक धोरण ठरले आहे.

२००५ मध्ये युनोच्या माध्यमातून ‘ह्योगो कृती आकृतिबंध’ ठरविण्यात आला. २००५ ते २०१५ या काळात युनोच्या सदस्य देशांनी सदर आकृतिबंधाची अंमलबजावणी करण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे मान्य केले. तो योग्यरीत्या अंमलात आणण्यासाठी प्रतिवर्षी एक उद्देश निश्चित करून त्यानंतर संपूर्ण वर्षभर त्या अनुषंगाने प्रत्येक राष्ट्रामध्ये विविध उप्रक्रम राबविण्यात येतात. यात समाजप्रबोधनावर भर देण्यात येतो. २००४ मध्ये ‘आपत्तीतून निर्माण होऊ शकणारे भविष्यातली प्रश्न’, २००६मध्ये ‘शालेय शिक्षणाद्वारे आपत्ती घटविण्यात प्रत्येक नागरिकाचा सहभाग’, २००९ मध्ये’रुग्णालयांसाठी आपत्ती व्यवस्थापन’, २०१०मध्ये ‘आपले शहर आपत्तींपासून सुरक्षित’ तर २०१२ मध्ये ‘महिलाः आपत्ती आकुंचनातील संवेदनक्षम घटक’ असे विविध उद्देश ठरविण्यात आले होते.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..