नवीन लेखन...

वजन कमी करताना येणारे अडथळे

आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे वजन वाढीची समस्या बऱ्याच लोकांमध्ये आढळून येत आहे. ह्यासाठी बरेच प्रयत्न देखील केले जातात पण काही वेळा असाही अनुभव येतो की खूप प्रयत्न करूनही वजन कमी करणे कठीण होते. वजन कमी करण्यासाठी आपण काय करत आहोत? तर आपल्याच लक्षात येईल की ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या सर्व आपण करत आहेत. पण तरीसुद्धा फारसा फरक जाणवत नाही. त्याचे कारण म्हणजे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आपण खूपच साध्या गोष्टींचे पालन करण्यात कुठेतरी कमी पडतो.

वजन कमी करताना येणारे अडथळे

प्रोटीन्स कमी प्रमाणात घेणे-

आपल्या शारीरिक विकासासाठी योग्य प्रमाणात प्रोटीन्स आपल्या शरीराला मिळणे खूपच आवश्यक आहे. खासकरून वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये ते संतुलित प्रमाणात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे हाडे मजबूत होऊन अतिरिक्त फॅटपासून सुटका होण्यास मदत होते.

फळे कमी खाणे-

फळात नैसर्गिक स्वरुपात साखर असते हे सामान्य ज्ञान सर्वानांच आहे पण तरीसुद्धा अनेक लोक फळे खाणे टाळतात. फळांमध्ये अनेक प्रकारचे शरीराला पोषक असे घटक असतात. पण ह्याकडे नकळत दुर्लक्ष्य होते. फळे अनेक प्रकारच्या आजारांपासून मुक्त होण्यासाठी खूपच उपयुक्त असतात. साहजिकच कोणती फळे खावीत हे तुम्ही तज्ज्ञांकडून जाणून घ्या आणि त्याप्रमाणे फळे खा.

झोप कमी घेणे-

दिवसभराच्या कामामुळे आपण जर कमी झोप घेत असाल तर ते शक्यतो टाळा कारण झोप पूर्ण न झाल्यास आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी होवून मेटॉबॉलिझम कमी होते आणि त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढू लागते.

नियमित व्यायाम-

जर आपल्याला व्यायामाचा शरीरावर योग्य परिणाम व्हावा असे वाटत असल्यास वेळोवेळी व्यायामप्रकारात तज्ञांच्या सल्ल्यानुसार बदल करा आणि त्याचे काटेकोरपणे पालन करा.

Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..