नवीन लेखन...

ख्यातनाम गीतकार, नाटककार अनंत पाटील

महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारे अनेक भक्तीगीते व भावगीतांचे ख्यातनाम गीतकार, नाटककार अनंत पाटील यांचा जन्म २२ डिसेंबर १९४१ रोजी झाला.

महाराष्ट्र असू दे की सातासमुद्रापार प्रत्येक मराठी घरात ‘सत्यनारायण पुजेच्या वेळी लागणारे ‘ऐका सत्यनारायणाची कथा’, प्रत्येकाला जीवनाचे सार सांगणारं ‘जैसे ज्याचे कर्म तैसे, फळं देतो रे ईश्वर’ हे भावगीत असो की ‘चल गं सखे पंढरीला’, ‘दींडी चालली’, ‘रंजलो गांजलो’, ‘पाहिला मी डोळा, पंढरीचा सोहळा’, ‘वाट पंढरीची’, तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता अवघ्या दिनांच्या नाथा, आता तरी देवा मला पावशील का..,* यासारख्या हजारों विठ्ठल अभंगांची साद असो. गणेश वंदना,भारुड, कविता, अभंग, भावगीत, कोळीगीत, लग्नगीत, शोकगीत, बालगीत, समूहगीत, प्रबोधनपरगीत, लावणी, पोवाडा, कव्वाली, गझल, शेरोशायरी अशा असंख्य रचना अनंत पाटील यांनी रचल्या. पुढे अवघा महाराष्ट्र य रचनांच्या प्रेमात अखंड बुडाला. आजही या रचना नव्या पिढीलाही तितक्याच लोकप्रिय आहे. ऐका सत्यनारायणाची कथा… या सत्यनारायणाच्या पूजेवेळी लावल्या जाणा-या गीतकथांमधून अनंत पाटील महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहोचले. त्यांच्या या अजरामर गीतासाठी १९७५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. पाटील यांनी भक्तीगीतेही लिहिली. ‘जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर…’ हे त्यांचे गीतही प्रसिद्ध आहे. गायक प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली अनेक भक्तीगीते अनंत पाटील यांच्या लेखणीतून उतरली होती. पंढरीच्या विठ्ठलाचरणी त्यांची विशेष भक्ती होती. पांडुरंगावर त्यांनी अनेक गीते रचली. अनेक कोळीगीतांची रचनाही पाटील यांनी केली.

अनंत पाटील यांचा जन्म आगरी समाजात झाला. महाविद्यालयाच्या क्रिकेट संघात फलंदाज म्हणून खेळताना क्रिकेटमधे करियर करायचे स्वप्न आणि त्या दृष्टीने मुंबई रणजी संघामधे निवडीसाठी प्रयत्न करत असताना फक्त छंद म्हणून इंग्रजीमध्ये कविता करणे त्यानंतर हीचं आवड फॅशन कधी बनली ते त्यांना देखील समजले नाही. कव्वालींच्या स्पर्धांसाठी जुगलबंदी करत भारतभर त्यांनी भ्रमण केले.

आगरी-कोळी बोलीभाषेतील त्यांचं साहित्य अतुलनीय आहे. आद्यदेवी एकवीरा आईवर रचलेल्या गाण्यांचा संग्रह अगणित आहे. एवढंच नाही तर ‘आम्ही कोली दर्याचे राजे हाव’ ,’चिंबोरी हानली बारानची’, ‘आगिनगारी बोलतेय बेगिनगारी’, ‘हातानं भरल्या हिरव्या बांगड्या’, ‘आज कोलीवा-यात’, ‘एकविरा आई माझी सत्वाची माउली’, ‘एकीरा मातोसरी’ यांसारखी मनामनावर राज्य करणारी गीते त्यांनी रचली. १९८९ साली रचली गेलेली ‘शुभमंगल सावधान’ ही रचना आजही त्या पिढीच्या मनावर राज्य करत आहे. त्याच काळात नाटककार म्हणून त्यांनी लिहीलेले आणि दिग्दर्शित केलेले ‘आई तुझा आर्शीवाद’ हे नाटक अवघ्या महाराष्ट्रभर गाजले. त्यांनी ’अनेक भीमगीते’ लिहून प्रबोधन केले. शिवसेनेसाठी गीत लिहून ते सामना वृत्तपत्राच्या प्रथम पानावर छापून आल्यावर बाळासाहेबांनी मातोश्रीवर बोलावून त्यांचा सत्कार ही केला होता. २००१ साली त्यांना महाराष्ट्ररत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले.

आजमितीला त्यांची एकूण ३२ ‘अनंताची अभंग भजने’, ‘अनंताची अभंग गीते’ व ‘कोळीगीते व नृत्यगीते’ या शीर्षकाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. टी सिरिज, एच.एम.व्ही, कृणाल यांसारख्या प्रख्यात ध्वनीकंपन्यांची रेकॅार्ड कॅसेटस् यांचा आकडा सहज सांगता येण्यासारखा नाही. गायक प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप, मधुकर पाठक, राणी रुपलता, रंजना शिंदे, शकीला पुनवी, कविता कृष्णमुर्ती, उत्तरा केळकर, साधना सरगम, शकुंतला जाधव, सुदेश भोसले, सुरेश वाडकर, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, जगदीश पाटील, स्वप्निल बांदोडकर यांसारख्या प्रत्येक पिढीतील अनेक मातब्बर गायक-गायिकांनी त्यांनी लिहीलेली गाणी गायली आहेत. एखादं गाणं ऐकल्यावर पाहील्यावर आपण सहज त्या गाण्याला अभिनय करणा-याची किंवा गायकाची ओळख चिकटवतो पण या सा-या प्रक्रियेत एखाद्या गाण्याची खरी ओळख तो गीतकार किवा कवी असतो. कोणत्याही स्वरुपाच्या प्रसिध्दीची हाव न बाळगता, सरकारच्या मानधनाची अपेक्षा न ठेवता आपल्या आयुष्यात आपल्याच विश्वात रममाण होऊन, सामाजिक भान राखत जीवन ख-या अर्थाने समृद्ध कसे करायचे हे अनंत पाटील यांनी दाखवून दिले. साहित्यिक, राजकीय वर्तुळात वावरुनदेखील कोणत्याही प्रकारचे हेवेदावे त्यांनी केले नाहीत. त्यांच्या सांगितीक प्रवासात फक्त माणसे जोडली. अहमदाबादला एका जुगलबंदी कार्यक्रमाकरीता गेले असता एका मनोविकृत शाहीराने जेवणाच्या सुट्टीत भाजीतून त्यांना कुंकू टाकले आणि तो प्रयत्न यशस्वी होऊ त्यांचा स्वर जन्मभरासाठी बसला, गायकी बंद झाली परंतु त्यांनी हार न मानता गीताच्या माध्यमातून स्वकर्तुत्वावर खिंड लढवली. आयुष्यभर त्यांनी इतरांच्या जीवनात आनंद निर्माण केला…

अनंत पाटील यांचे २६ मार्च २०१० रोजी निधन झाले.

संकलन – संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..