नवीन लेखन...

गौतम बुद्धाच्या लेकरांना जवळ घ्या

लक्ष्मण माने यांना मी साता-याला भेटलो आहे. मध्यंतरी त्यांच्यावर काही आरोप झाले होते त्याचे पुढे काय झाले ते कळले नाही. पण त्यांनी बौद्ध धर्म का स्वीकारला याची कारणे देणारा लेख मात्र तमाम हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.

बौद्धधर्म हि एक स्वतंत्र विचार धारा आहे. गौतम बुद्धाचा जन्म हिंदू राज घराण्यात झाला होता .बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारून खरे तर हिंदू समाजावर उपकारच केले आहेत.

कल्पना करा कि – बाबासाहेबांनी बौद्ध धर्म न स्वीकारता मुस्लिम अथवा ख्रिस्ती धर्म स्वीकारला असता तर या देशांत काय झाले असते. दलितांवर परंपरागत शेकडो वर्षे केलेल्या अत्याचाराची परिणीती म्हणजे प.पु. बाबासाहेबांचे धर्मांतर हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे. या नंतरचा काळ कसा असेल याची कल्पना या लेखातून आली आहे. मी या लेखाशी पूर्णपणे सहमत आहे. समाजात potential difference असलेली अनेक माणसे असतात. पण त्यांना समाजानी नीट वागणूक दिली नाही तर असे धर्मांतर होते.

आपल्या देशाच्या पूर्वेकडील अनेक राष्ट्र बौद्ध धर्मियांनी व्यापली आहेत. दलितांनी हा धर्म स्वीकारला म्हणून या धर्मालाच “दलित” लेखण्याचा मूर्खपणा काही मंडळी करीत असतात. पूर्वी काही मंडळींना हा धोका जाणवला होता म्हणून त्यांनी गौतम बुद्धाला विष्णूचा १० वा अवतार असल्याचे जाहीर केले होते. हिंदू-बौद्ध याच मातीत वाढले, मोठे झाले याची जाणीव सतत ठेवून वागले पाहिजे. माउली त्यांच्या पसायदानातून सतत हाच तर संदेश देतात. पण लक्षात कोण घेतोय ?

असो सर्व बौद्ध आणि हिंदू भावंडांना शुभ कामना. हरी ओम !!! नमो बुद्धाय !!!!

— चिंतामणी कारखानीस

चिंतामणी कारखानीस
About चिंतामणी कारखानीस 75 Articles
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..