नवीन लेखन...

डॉ. डी. वाय. पाटील

डॉ.ज्ञानदेव यशवंतराव पाटील अर्थात तुम्हा-आम्हाला परिचित असलेले नाव म्हणजे ‘डॉ.डी.वाय.पाटील यांचा जन्म. २२ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापुर येथे झाला.

सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून सुरु केलेली राजकीय कारकीर्द पुढे अनेक मोठमोठ्या पदांपर्यंत घेऊन गेली. कार्यकर्ता, महापौर ते अगदी राज्याचे राज्यपाल, असा विस्मयचकित करणारा प्रवास डॉ. डी. वाय पाटील यांचा आहे.

डी. वाय. पाटील यांच्या घरात काँग्रेसची विचारधारा होती. त्यामुळे अर्थात त्यांची राजकीय कारकीर्द काँग्रेसमधून सुरु होणं सहाजिक होतं आणि झालंही तसेच कोल्हापुरातून डी. वाय. पाटील यांनी राजकारणात प्रवेश केला. १९५७ ते १९६२ या काळात डॉ. डी. वाय. पाटील हे काँग्रेसकडून कोल्हापूरचे महापौर होते. १९६७ आणि १९७२ साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत आमदार म्हणूनही निवडून गेले होते. डॉ. डी. वाय. पाटील हे २००९ ते २०१३ या काळात त्रिपुरा, तर २०१३ ते १०४ या काळात बिहारचे राज्यपाल होते. शिवाय, त्यांच्याकडे पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचाही काही काळ कार्यभार होता.

भारत सरकारने डॉ. डी. वाय. पाटील यांच्या कार्याचा ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरवले आहे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..