नवीन लेखन...

दिग्दर्शक मृणाल सेन

मृणाल सेन यांचा जन्म १४ मे १९२३ रोजी सध्या बांगलादेशमध्ये असणाऱ्या फरीदपूरमध्ये झाला.

सत्तर-ऐशींच्या दशकात सुरू झालेल्या समांतर चित्रपट चळवळीत मृणाल सेन यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. माणूस केंद्रस्थानी ठेवून त्याचे दुख, जगण्याचे प्रश्न प्रभावीपणे रुपेरी पडद्यावर मांडून व्यवस्थेला प्रश्न विचारू पाहणारे मृणाल सेन यांनी १९५५ मध्ये ‘रात भोर’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यांचा हा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर १९६० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नील आकाशेर नीचे’ या चित्रपटामुळे त्यांची ओळख निर्माण झाली.

‘बाइशे श्रावण’ या चित्रपटामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली. मिथुन चक्रवर्ती यांचा पदार्पणाचा चित्रपट असलेल्या ‘मृगया’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

मृणाल सेन यांना २० राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. आंतरराष्ट्रीय जगतात त्यांच्या चित्रपटांची दखल घेण्यात आली.

सिनेजगतातील योगदानासाठी त्यांना १९७९ मध्ये नेहरू-सोव्हिएत लँड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

मृणाल सेन यांनी वयाच्या ८० व्या वर्षी २००२ साली ‘अमर भुवान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

पद्मभूषण या नागरी पुरस्काराने आणि चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते.

विद्यार्थी दशेत असताना डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनेच्या सांस्कृतिक आघाडीवर मृणाल सेन सक्रिय होते. मात्र, त्यांनी कधीही डाव्या पक्षाचे सभासदत्व स्विकारले नाही.

‘इप्टा’ या सांस्कृतिक संघटनेत ते सक्रिय होते.

मृणाल सेन यांचे ३० डिसेंबर २०१८ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..