नवीन लेखन...

हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत कारभारी दादोजी कोंडदेव

हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत कारभारी, शहाजी राजेंचे अत्यंत विश्वासू सरदार, तत्कालीन पुणे प्रातांत आपल्या शिस्तबद्ध कार्यपध्दतीने स्वराज्याची व्यवस्था लावणारे कर्तबगार व्यक्तिमत्त्व दादोजी कोंडदेव यांचा जन्म १५७७ साली झाला.

शहाजी महाराजांच्या कडे असलेल्या देशमुखी गावांपैकी मलठण गावचे ते कुलकर्णी होते. शहाजी महाराजांनी दादोजी कोंडदेव यांना आपल्या पुणे जहागिरीचा कारभारी म्हणून नेमले होते.

शहाजीने जिजाबाई व शिवाजी यांची दादोजीबरोबर पुण्याच्या आसपास राहण्याची व्यवस्था केली. त्याने शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी अंगावर घेऊन त्यास युद्धाचे व राजनीतिशास्त्रांचे शिक्षण देवविले. त्या दोघांसाठी पुण्यास लाल महाल हा वाडाही बांधला.

दादोजी येण्यापूर्वी पुणे जहागिरीची स्थिती वाईट होती. विजापुरी सरदार रायाराव याने पुणे जाळून त्यावर गाढवाचा नांगर फिरवला होता पण दादोजीने सोन्याच्या फाळाने जमीन नांगरून शेतीला ऊर्जितावस्था आणिली, अशी परंपरागत कथा सांगण्यात येते. परागंदा झालेल्या रयतेस दादोजीने परत बोलावून पुन्हा शेती करण्यास प्रोत्साहन दिले, जमिनीची मोजणी करून प्रतवारी लावली. पुण्यातील आंबील ओढ्याला धरण बांधले. पुणे प्रदेशाच्या सुरक्षिततेची दादोजीने चोख व्यवस्था केली.

देशमुखीतील तंटे मोडून त्यांना स्वराज्याच्या कामगिरीत एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. अनेक भांडणांचे निवाडे केले. दादोजी एक लहानसाच ब्राह्मण पण त्याने केलेले निवाडे औरंगजेबासही मान्य झाले, असे पहिल्या शाहूने त्याच्याविषयी उद्गार काढले आहेत. दादोजीला शिवाजीचा पालक आणि स्वराज्याच्या प्राथमिक अवस्थेतील मार्गदर्शक ह्या नात्याने महत्वाचे स्थान आहे.

शहाजी महाराज व शिवाजी महाराज यांचे एक अत्यंत विश्वासू व कर्तबगार कारभारी दादोजी कोंडदेव यांचे ७ मार्च १६४७ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..