नवीन लेखन...

चलनी नोटा, सुटे पैसे आणि आरोग्य

आपल्या देशाचे सरकार आपल्या चलनाचा सांभाळ कसा चांगल्या रीतीने करत येईल याकडे खुपच गांभीर्याने लक्ष देत आहे. चलन फुगवटा होणार नाही, चलनाचे अवमुल्यन होणार नाही, याकडे लक्ष देत आहे.

आपण रोजच्या जीवनात या चलनी नोटा आणि सुटे पैसे कळत न कळत अयोग्य रीतीने हाताळत असतो याकडे आपले दुर्लक्ष होत आहे ह्याचे आपल्याला भान सुद्धा राहत नाही आणि म्हणून हा प्रपंच.

आपण आपल्या दागिन्यांचे, आरोग्याचे, मुलाबाळांचे संरक्षण करतो, त्याची देखभाल करतो त्याप्रमाणेच या चलनी नोटांचीही आपल्याला या देशाचे प्रामाणिक नागरिक म्हणून देखभाल करावयाची आहे. पण तसे होताना दिसत नाही असे आपल्या दैनंदिन कामकाजात अनुभवास येते.

आपण कळत न कळत नोटांचे अवमूल्यन कसे करत असतो ते बघू.

१. बँका, पोस्ट ऑफिसेस, रेल्वे, बेस्ट बसेसचे काही कंडक्टर्स, सरकारी-निमसरकारी कार्यालये यांचे काही कर्मचारी व्यवहारातील पैश्यांची देवाण-घेवाण करताना त्या नोटा मोजताना थुंकीचा सर्रास उपयोग करताना दिसतात.

२. काही कॅशियर तर चक्क वेगवेगळया नोटा घेतल्यावर त्या स्वत:कडे असलेल्या नोटांत (उदा. हजार, पाचशे, शंभर, पन्नास, दहाच्या) मिसळण्या आगोदर त्यावर स्वत:कडे असलेल्या नोटांवर आधीच्या नोटांचा आकडा खोडून आता किती नोटा जमा झाल्या आहेत ते समजण्यासाठी आधीचा आकडा खोडून त्यावर नवीन आकडा लिहिणार. उदा. समजा क्याशियरकडे ५०० च्या ७० नोटा होत्या आणि त्यात २० नोटा जमा झाल्या तर त्या आधी नोटांवर लिहिलेला आकडा खोडून ९० लिहिणार आणि तेही बॉल पेनाने.

३. काहीवेळा असे दिसते की आपल्या देशाचे सुजाण नागरिक नोटांवर नावे, फोन नंबर, तर काही वेळा तर चक्क निरोप लिहिलेले असतात, तर काही वेळा बॉलपेन चालते का नाही हे बघण्यासाठी एखाद्या रफ पेपारासारखा नोटेचा उपयोग ही करण्यासाठी मागेपुढे बघत नाहीत हे खरोखर कुठेतरी थांबलेच पाहिजे. काही नागरिक नोटा निष्काळजीपणे हाताळतात. याला देशप्रेम नसल्याचे हे द्योतक म्हणावे का?

४. आपण देशाच्या चलनांचा असा दुरुपयोग करून चलनांचा अपमान करणार असू (किंबहुना श्री लक्ष्मीमातेचा हा अपमान आहे) तसेच चलनाचा आणि पर्यायाने देशाचा अपमान करत राहिलो तर हे योग्य नाही. असे ऐकण्यात येते की काही परदेशात तर हा गुन्हा मानून कायदेशीररीत्या दंड केला जातो. कित्येक वेळा चलनी नोटा इतक्या घडी घालून ठेवण्यात येतात की त्या पुन्हा वापरात आल्यावर खुपच खराब होतात. काही वेळा नोटांवर रंग लागलेले असतात, मळलेल्या असतात. आज आपला देश स्वतंत्र होऊन ६० वर्षांपेक्षा जास्त वर्षे होण्यास आली तरी पण नागरिकांच्या वृत्ती बदललेल्या नाहीत. हिंसक, गचाळ, आळशी, देशप्रेम नसल्याचे हे द्योतक आहे. यावरून आपल्या देशाची प्रतिमा कशी आहे हे बघितले जाते.

आता आपण वरील सर्व गोष्टींचा व्यवहारात चलनी नोटा आणि चिल्लर अयोग्य रीतीने हाताळल्यामुळे आपल्या आरोग्यावर कसा विपरीत परिणाम होऊ शकतो ते पाहू :-

आपण पाहतो काही बेस्टबस आणि एसटीमध्ये काही कंडक्टर नोटा व तिकिटे देताना थुंकी लावतात. पोस्टात, बँकेत, रेल्वेने तिकीट देणारे, नोटा मोजताना थुंकी लावतात. पण या सगळ्याचा परिणाम त्यांच्या व आपल्या आरोग्यावर पडणार असतो. कारण ते तिकीट किंवा नोटा याला आपली बोटे लागणार, खिश्यात किंवा पाकिटात ठेवणार त्या दुसर्‍या नोटांनासुद्धा त्यांचा स्पर्श झाल्याने त्याही खराब होणार. त्यांच्या थुंकीद्वारे त्यांना जर संसर्गजन्य रोग झाला असल्यास तो आपल्याला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आपण कळत न कळत देवळांतून बाहेर पडल्यावर बाहेर बसणार्‍या भिकार्‍यांना सुटी नाणी दान म्हणून देतो, का तर पुण्य लागते म्हणून. काही श्रीमंत लोक तर नोटा वाटतात. त्या भिकार्‍यांच्या हाताला काही स्पर्शजन्य रोग झाला असेल काय कोण जाणे, त्याच नोटा परत चलनात येतात कालांतराने कशावरून आपल्याला परत मिळणार नाहीत, आपल्या तोजोरीत जाणार नाहीत. असे दृश्य तर नेहमी आपण ट्रेनमध्ये बघतो.

काही मुला-माणसांना सुटे पैसे तोंडात घालण्याची वाईट सवय असते. त्यावेळेस न जाणो आपल्यालासुद्धा तो संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता बळावते.

तरी सर्व सुजाण भारतीय नागरिकांस नम्रपणे असे सांगावेसे वाटते की कोणीही भारतीय किंवा परदेशी नागरिक चलनी नोटांचा वरील बाबींसाठी दुरुपयोग करीत असेल तर त्याला तेथेच अटकाव करा की जेणेकरून आपण आपल्या चलनी नोटा सुंदर, सुरक्षित, स्वच्छ ठेऊ व आपल्या देशाची शान वाढवू. आपल्या बरोबरीने दुसर्यांचेही आरोग्य सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करू.

येणार्‍या दिवसांत याचे गंभीर परिणाम होण्यापासून वाचायचे असेल तर प्रथम आपण आपल्यापासून खालील गोष्टींची काळजी घेऊन सुरुवात करू.

१. जेवणा आगोदर हात साबणाने धुण्याची सवय घरातील सर्वांना लावू.

२. सगळे क्याशियर व नागरिक कटाक्षाने नोटांवर लिहिण्याचे तत्काळ थांबावरील.

३. कॅश किंवा नाही मोजल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवू.

४. कंडक्टर्स व इतर संबंधित खात्याचे क्याशियर्स थुंकी ऐवजी पाण्याचा उपयोग करतील. (खरे तर त्यांना सगळ्या सुविधा मिळत असताना सुद्धा कंटाळा करतात, शोर्टकट घेतात) तसेच नोटांची काळजी घेतील.

५. नागरिक भिकार्‍यांना भीक घालण्याचे कटाक्षाने तळातील.

तरी आशा आहे की वरील सर्व गोष्टी केल्याने देव सेवेचे व्रत अंगीकारल्याचे समाधान मिळेल. देशाच्या समाज सुधारणेत खारीचा वाटा उचलल्या सारखे वाटेल.

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..