नवीन लेखन...

क्रिकेट महर्षी दिनकर बळवंत देवधर

दिनकर बळवंत देवधर यांचा जन्म १४ जानेवारी १८९२ रोजी झाला.

दिनकर बळवंत देवधर यांचे शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात झाले. १९०६ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी कँपमधील एका शाळेविरुद्ध शतक काढले. दोन वर्षांतच शालेय संघाचे नायकपद त्यांच्याकडे आले. शालेय शिक्षणानंतर ते फर्ग्युसन कॉलेजात दाखल झाले.

देवधरांनी आर्थर गिलीगनच्या नेतृत्वाखालील परदेशी संघाविरुद्ध भारतातील प्रथमश्रेणीतील पहिले शतक रचले होते. त्यावेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अस्तित्वात नसल्याने हे भारतासाठीचे पहिले कसोटी शतक ठरले नाही.

देवधरांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राने १९३९-४० आणि १९४०-४१ या लागोपाठच्या वर्षांमध्ये रणजी करंडक जिंकला. १८५० च्या सुमारास पार्शांनी झोरास्ट्रियन क्लब स्थापन करून संघटित क्रिकेट खेळण्यास प्रारंभ केला होता. १८८५ आणि १८८७ मध्ये त्यांच्या संघाने परदेश दौरे केले. त्याकाळी पुणे आणि मुंबईत भारतात नोकरीसाठी आलेल्या इंग्रजांचा संघ विरुद्ध पारशी संघ अशी वार्षिक लढत प्रेसिडेन्सी सामने या नावाने खेळली जाई. १८९५ ते १९०६ या काळात ही स्पर्धा चालली. १९०७ मध्ये हिंदूंचा संघ या स्पर्धेत सामील झाला आणि ही स्पर्धा तिरंगी झाली. १९०९ मध्ये अॅग्रिकल्चरल कॉलेजविरुद्ध देवधरांनी काढलेले शतक (११७) आणि १९१० मधील कॉलेज क्रिकेटमधील कामगिरी पाहून हिंदू संघातर्फे त्याला आमंत्रण आले. त्यांचा प्रत्यक्ष सामन्यात मात्र समावेश झाला नाही. संघ जाहीर झाल्यानंतर ऐनवेळी त्यांना वगळण्यात आले होते. यानंतरही अनेकदा नियम आणि शिरस्त्यांकडे दुर्लक्ष करून त्यांना डावलले गेले.

१९१२ मध्ये तिरंगी स्पर्धेत मुस्लिम संघ उतरल्यावर स्पर्धा चौरंगी झाली. १९३० ते ३३ हा अपवाद वगळता (स्वदेशी आणि असहकार चळवळ) १९३६ पर्यंत ही स्पर्धा चालू राहिली. १९३७ मध्ये तीत द रेस्ट (इतरेजन – ख्रिस्त्री, आंग्ल-भारतीय, ज्यू) या संघांची भर पडली आणि १९४२ चा अपवाद वगळता १९४५ पर्यंत हे सामने चालले. जातीय वैमनस्यास कारणीभूत होत असल्यावरून १९४६ पासून ही स्पर्धा बंद करण्यात आली. १९११ मध्ये देवधर पार्शी संघाविरुद्ध पहिला प्रथमश्रेणी सामना खेळले. याच वर्षी भारताचा पहिला संघ परदेश दौऱ्यावर गेला होता. १९१२ मध्ये बी ए च्या अभ्यासामुळे देवधर क्रिकेटपासून दूर राहिले. १९१३ मध्ये चुनीलाल मेहतांच्या नेतृत्वाखालील हिंदू संघाने प्रथमतः युरोपियन संघाला नमविले, त्या हिंदू संघात देवधरांचा समावेश होता. नंतर १९२९ पर्यंत सतत ते तिरंगी सामन्यांमध्ये खेळले. त्या काळातील हे एवढेच प्रथमश्रेणीचे सामने होते. त्यातही बाद पद्धत असल्याने संघ पहिल्याच सामन्यात गारद झाल्यास पुढची संधी पुढच्या वर्षीच मिळे. १९३४ व १९३६ या दोन वर्षांमध्ये देवधर चौरंगी सामन्यांमध्ये खेळले. पंचरंगी सामन्यांमध्ये ते खेळले नाहीत.

प्रवासी एमसीसी संघाविरुद्ध पुण्यात १९२६-२७ च्या हंगामात अखिल भारतीय संघाकडून खेळताना देवधरांनी १४४ धावा काढल्या होत्या. हा सामना १६ ते १८ डिसेंबर १९२६ असा तीन दिवसांचा होता. भारतात राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट मंडळ अस्तित्वातच नसल्याने ही अनधिकृत कसोटी मानली गेली. विजयानगरमचे महाराजकुमारनी आमंत्रिक केलेल्या हॉब्ज-सटक्लिफ संघाविरुद्ध कोलंबोत झालेल्या तीन अनधिकृत कसोट्यांमध्ये भारतीय संघात देवधरांचा समावेश होता. पहिल्या कसोटीत त्यांनी नाबाद १०० धावा काढल्या होत्या.

१९३४-३५ मध्ये पहिल्याप्रथम राष्ट्रीय अजिंक्यपदासाठी रणजी स्पर्धा झाली. यात महाराष्ट्र पहिल्याच सामन्यात मुंबईविरुद्ध पहिल्या डावातील पिछाडीमुळे गमावला. महाराष्ट्राचे कर्णधार देवधर यांनी ५७ तर कोल्हापूरच्या विजय हजारेंनी ६५ धावा काढल्या होत्या.

१९३५-३६ मध्ये पुन्हा महाराष्ट्राचा संघ मुंबईकडून पराभूत झाला. १९३६-३७ मध्ये वेस्टर्न इंडिया स्टेट्स क्रिकेट असोसिएशन (विस्का) च्या संघाने महाराष्ट्राला पराभूत केले. पुढच्या हंगामात आणि त्याच्या पुढच्यातही.

१९३९-४० च्या हंगामापासून महाराष्ट्रातील प्रथमश्रेणीचे सुवर्णयुग सुरू झाले. लागोपाठच्या नऊ सामन्यांमध्ये महाराष्ट्राने मोठमोठ्या धावसंख्या रचीत विजय मिळविले. सलग दोन वर्षे महाराष्ट्राने अजिंक्यपद पटकावले आणि महाराष्ट्रियन मॅग्निट्यूड असा नवा शब्दप्रयोग या संघाने भाषेला दिला. ५४३, ६५०, ४८२, ५८१, ६७५, ५१७, ४६० आणि तब्बल ७९८ अशा धावा लागोपाठच्या सामन्यांमध्ये महाराष्ट्राने उभारल्या. १९३२ मध्ये पोरबंदरच्या महाराजांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला असता देवधरांचे वय चाळीस असल्याचे सांगून त्यांना डावलण्यात आले होते.

१९४६-४७ मध्ये दि.ब. देवधर प्रथमश्रेणीतून निवृत्त झाले. त्यांचे पुत्र शरद देवधर हे प्रथमश्रेणी क्रिकेट खेळलेले असून त्यांच्या नावावर एक शतक आहे. तारा, सुमन आणि श्यामा या त्यांच्या मुली राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन खेळलेल्या आहेत.देवधर वयाच्या १४व्या वर्षापासून ६४ व्या वर्षापर्यंत पीवायसी कडून खेळले.

वैयक्तिक आयुष्यातही शतकवीर ठरलेल्या या क्रिकेटमहर्षीचा महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने कालांतराने पुण्यातील गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पूर्णाकृती पुतळा उभारला. याच स्टेडियमवर मुंबई-सौराष्ट्र हा अंतिम फेरीचा सामना २४-२-२९१६ रोजी झाला. १९४० मध्ये २४ फेब्रुवारी रोजीच अंतिम सामना सुरू झाला होता. त्यानंतर बरोबर ७६ वर्षांनी पुण्यात रणजी करंडक अंतिम सामना झाला. दि ब देवधरांनी आपल्या शतकाकडे हे आत्मचरित्र लिहीले होते.

दि.ब. देवधर यांची कारकीर्द.

८१ सामने, १३३ डाव, १८ वेळा नाबाद, ४५२२ धावा, २४६ सर्वोच्च, प्रतिडाव ३४.०० धावा, ९ शतके, २७ अर्धशतके, ७० झेल. २४६ धावा वयाच्या अठ्ठेचाळिसाव्या वर्षी मुंबईविरुद्ध रणजी करंडकात.

क्रिकेट महर्षी दि ब देवधर यांचे निधन २४ ऑगस्ट १९९३ रोजी झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..