वस्तु, पदार्थ, प्रकृती सर्वांची आवश्यकता आपल्याला आहे. त्यांचा शिवाय आपले जीवन नीरस आहे. म्हणून त्यांना ही हृदयाच्या निर्मळ भावनांनी धन्यवाद. तसेच ज्या ईश्वराने वेळोवेळी आपल्याला मदत केली. जिथे सगळ्या आशा संपल्या होत्या अशा वेळी जीवन सुखांनी भरून टाकले अश्या त्या परम सत्येला धन्यवाद करायला विसरू नका. हा धन्यवाद मंत्र सतत करत राहिले तर कधीच दुःखाची झळ आपल्याला लागू शकणार नाही. […]
बऱ्याच कुटुंबातून सध्या, गृहकलह वाढत असल्याचे जाणवले. दोन पिढयांमधला संवाद संपत चालल्या मुळे त्यांच्यातील समन्वय देखील हरवत चाललेला दिसतो आहे. त्यामुळे विवाहित तरुणाई / प्रौढ मंडळी मानसिक तणावाखाली असल्याचे जाणवले.
कौटुंबिक कलह म्हटल्यावर बऱ्याचदा स्त्रियांनाच विशेषतः सुनांना जबाबदार धरले जाते, परंतु यामध्ये ज्येष्ठ सदस्य आणि कर्त्या पुरुषांची भूमिका देखील तितकीच महत्वाची असते. […]
वर्ष भर खेळायचं, हुंदडायच, वेगवेगळ्या कार्यक्रमांत सहभाग घ्यायचा आणि सरते शेवटी परीक्षेच्या वेळी मात्र मनात भीतीने घर करायचं कारण अभ्यास झालेला नसतो. […]
ट्रिप ला जाताना किंवा कुठल्याही प्रवासाला जाताना आपल्या बॅगेत वेफर्स, बिस्किटं, गोळ्या, पोळ्या यांची पॅकेट्स असतातच. अगदी आपण वेळेनुसार काय खायचे या प्लॅंनिंग ने सगळं बरोबर घेतो, पण खाऊन झालं की मात्र आपल्याला त्या रिकाम्या पिशव्या अचानक जड वाटायला लागतात. […]
जर प्रत्येकानं असा छंद बाळगला तरी हजारो कुटुंबांच्या भाकरीची सोय होईल … अकलूज गावचा एक माणूस गेली ३० ते ३५ वर्षे सीताफळांच्या बिया साठवतो. मुंबईला, पुण्याला कामानिमित्त जावं लागतं. तो पिशवी भरून त्या घेतो आणि जाताना घाटात गाडी थांबते तिथं तिथं दरीत फेकून देतो. हल्ली त्या घाटावर पाट्यांमध्ये पिकलेली सीताफळं घेऊन अनेकजण विक्रीला बसलेले असतात. अलीकडे […]
आजकाल इंटरनेट चा जमाना असल्यामुळे सातत्य हे व्यायाम, प्रत्यक्ष गप्पा, मैदानी खेळ या पेक्षा वेब सिरीज, पब जी सारखे बसून लढायचे खेळ, फेबु वरच्या वैचारिक गप्पा आणि टीका टोचणी यात जास्त आले आहे. […]