मराठीमध्ये कोशवाङ्मयाची समृद्ध परंपरा आहे. मराठी भाषेत कोशरचना सुरू होऊन आता सुमारे १५० वर्षे लोटली आहेत. मराठीत १९व्या शतकात जी कोशरचना झाली ती सामान्यतः शब्दकोश-स्वरूपाची झाली. संस्कृतीच्या विकसनशील काळात आधी शब्दकोश निर्माण होतात; त्यानंतर ज्ञानकोशांची रचना होऊ लागते. अव्वल इंग्रजी काळात शब्दकोश रचनेमागच्या प्रमुख प्रेरणा इंग्रजी राज्यकर्त्यांची मराठी भाषा शिकण्याची गरज आणि ख्रिस्ती धर्मप्रचारकांची धर्मप्रसाराची गरज या होत्या. […]
भारतात गाजणारा एक विषय आहे तो म्हणजे नामांतराचा, जे नाव सध्या आहे ते बदलण्याच्या मागणीचा. हे नाव कशाचेही असू शकते. रस्ता, चौक, बाग, शहर, जिल्हा, राज्य यांचे वा बस स्टँड, रेल्वे स्टेशन, विमानतळ यांचे वा विद्यापीठ, आस्थापना यांचे. स्वतःचे नाव बदलणारांची दखल बाकीच्यांनी घ्यायची गरज नसते. पण या सार्वजनिक ठिकाणांची नावे बदलण्यासाठी जनमताचा कौल घ्यावा लागतो. नाव बदलण्याचा आग्रह धरणारे ‘नावात काय नाही’ ची वाट धरणारे असतात. […]
काँग्रेस सरकारने आणिबाणी लावली त्यावेळी मी बी.एस.सी फायनल ला होतो. माझा मित्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता डॉ. गिरीश वेलणकर हा एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला होता. आम्ही दोघांनी आपापल्या घरी सांगितले की या वेळी आम्ही ही परीक्षा देणार नाही. आणिबाणी विरुद्धच्या या लढ्यात यापुढे आम्हाला अटक किंवा काहीही होऊ शकते. […]
नुकतेच टीव्हीवर पाण्यावरचा तरंगता दगड कुंभमेळा दरम्यान दाखवला होता. अनेक जण त्याला पाया पडताना दाखवले जात होते. कोणीही वैज्ञानिक दृष्टिकोन जाणून घेऊन थांबत नव्हतें, थांबणार नाहीत.अध्यात्मासमोर कधीकधी विज्ञानही हतबल होतं. कोणताच हेतू नसलेले, कोणता तरी हेतू असलेले तर काही जण केवळ बघे म्हणून यात सामील होतात. […]
रात्र असते हिमनगाच टोक,त्याच्याखाली असंख्य विचार सुस्त पहुडलेले असतात. रात्र कुणाला प्रणयाचा अध्याय सुरू करणारी असतें,कुणाला नकोशीअसतें. विवाहा नंतर एकमेकांच्या स्वभावावर शिक्कामोर्तब करणारं रात्र हे नक्षत्रांचे देणं असतं. रात्र म्हणजे शरीर व मनाच्या समाधानाचं परिमाण. जेवढं समाधान अधिक तेवढा परिणाम चांगला. […]
माणसाला अवयव नाही चालवत तर मन त्याला चालवतं.अवयव शरीरांचे असतात पण मन त्यांना नियंत्रित करतं. शरीराचे अवयव तक्तात पण मनाचे अवयव ज्याचे मजबूत असतात तो थकत नाही इतिहास घडवतो. जीवनात अनेक निराशेचे प्रसंग तुम्हाला निराश करतात, थांबवतात, पुढे जाण्यापासून परावृत्त करतात. […]
वेळेअभावी ज्यांना पुस्तके वाचणे जमत नाही ते पुस्तकातील आशय ऑडिओ स्वरूपात ऐकू शकतात. नेत्रहीनावांसाठी सुद्धा ऐकून ज्ञान मिळवता येते. पण सगळाच आशय ऑडिओ स्वरूपात उपलब्ध नसतो. नेत्रहीनांसाठी अशी खास व्यवस्था प्राची गुर्जर यांनी त्यांच्या ‘यशोवाणी’ या स्वयंसेवी गटामार्फत गेल्या पंधरा वर्षांपासून दृष्टिबाधित व्यक्तींसाठी ध्वनिमुद्रित वाचनसेवा विनामूल्य देशभर पुरवली आहे. […]
छंद हेमानवीजीवनातील केवळ विरंगुळा असत नाहीत तर जीवनाला आकारही देतात. अभ्यास जेव्हां छंद बनतों तेव्हां नाविन्यपूर्ण व सृजन आकाराला येतं. प्रत्येक सृजन पायवाट असते प्रेरणेची. कोणत्याही छंदाचा अभ्यास केला की त्यात प्राविण्य मिळतं आणि यशा कडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो.बुद्धीला व्यायाम देणारी शब्दकोडी म्हणजे अनेकांचे वेळ घालवण्याचे साधन असते. […]
सृजन प्रकाशन तर्फे नामदेव माळी यांनी सुद्धा बरीच पुस्तके लहान मुलांची प्रकाशित केली आहेत. ज्यांना रस्ता शोधायचा असतो त्यांना पायवाट आपोआप मिळतें. असंख्य पायवाटा आपल्या अवतीभवती असतात, फक्त शोधक दृष्टी हवी व एक होती तरी पाऊल पुढे टाकण्याची इच्छाशक्ती हवी. […]
प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकपणे पाहण्याची सवय मनाला केवळ असून चालत नाही. शरीराला सुद्धा मनाची साथ द्यावी लागते. मी विजेता होणारच या पुस्तकाची शंभरावी आवृत्ती केवळ निघाली नाही तर अनेकांना यशाची पायवाट दाखवणारे उमेश कणकवलीकर यांनी अनेकांच्या जीवनात अमुलाग्रह बदलही केला आहे. […]