नवीन लेखन...

कृषी, शेतीविषयक माहिती, घडामोडी यावरील लेखन

शहरी माणसाच्या नजरेतून… नागपूर येथील दुसरे मराठी शेतकरी साहित्य संमेलन ….

प्रती, श्री. गंगाधर मुटे, कार्याध्याक्ष अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नमस्कार, दुसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन दिनांक २०-२१ फेब्रुवारी २०१६ रोजी नागपूर येथे अतिशय झोकात आणि उत्साहात पार पडले ह्यात शंकाच नाही. तुमचे, तसेच सर्व सहकाऱ्यांचे मी रविंद्र कामठे हार्दिक अभिनंदन आणि करावे तितके कौतुक थोडे आहे.  सर्वांची नावे घेणे योग्य नसल्यामुळे माझा […]

सुगंधी शेती !

ग्लोबल वॉर्मिंगमुळे सर्व जगात हवामानाचे अंदाज चुकत आहेत. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा असे आपल्याला दरवर्षी अनुभवास येते. आपल्या महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांनी शेतीचे नुकसान झाल्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. यावर मात करण्यासाठी पारंपारिक शेती सोडून काही नवीन मार्ग शेतकरी बंधू शोधू लागले आणि त्यात त्यांना यश येऊन त्यांनी सुगंधी तेल मिळणाऱ्या गवताची शेती करण्यास सुरवात केली […]

विदर्भ !!!!

अतिशय हृदयस्पर्शी कविता आहे हि !! मी विदर्भात खूप फिरलो आहे .कित्तेक एकर जमिनीचा मालक सुद्धा वीज आणि पाणी नसल्याने विपन्न अवस्थेत आहे.शेतात विहीर आहे पण विहिरीवर बसवलेल्या पंपावर विजेची जोडणी मिळत नाही. ज्यांच्या कडे पंपाला विजेची जोडणी आहे त्यांना वीज मिळण्यासाठी रात्रभर शेतात जागे राहावे लागते.रात्री फक्त ३ तास पंप चालतो ते सुद्धा मध्य रात्रीनंतर […]

कांदेपुराण – बहुगुणी औषधी कांदा

कांदा हे एक अतिशय बहुगुणी, बहुमोली कंदमूळ आहे. आपल्या जेवणात तर तो नेहमी असतोच, पण राजकारणातही तो गाजतो. केवळ कांद्यामुळे काही राज्यांची सरकारं उलथंवली गेल्याची उदाहरणं जुनी नाहीत. असा या कांद्याविषयी थोडं जाणून घेऊ. कांद्याचे दोन प्रकार आहेत. लाल कांदा आणि पांढरा कांदा. कांदा हा अतिशय स्वादिष्ट पदार्थ आहे. तो जेवणाची लज्जत वाढवतो. कांद्याशिवाय मिसळीची कल्पनाच […]

गुणकारी वनस्पती जेष्ठमध !!

प्राचीन भारतीय आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये लाखो वनस्पतींचा वापर होत आला, परंतु पाश्चात्य एलोपेथिक औषधांच्या भडीमाराने भारतीय अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला गेला. भारत हे कृषिप्रधान राष्ट्र आहे, भारताची अर्थव्यवस्था ही शेती उत्पन्नावर अवलंबून आहे. पारंपारिक पद्धतीने केला जाणारा कृषिव्यवसाय आज आधुनिकतेकडे झुकलेला दिसतो. यांत्रिक शेती-अवजारांच्या वापराबरोबरच प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. भारतीय शेतीत उत्पन्नाचे प्रमाण वाढत असले […]

कंटकारी / डोर्ली …एक अनुपम्य औषधी..!

आपल्या सभोवती अनेक वनस्पती असतात, परंतु त्यांच्या उपयोगाबाबत माहिती नसल्याने आपण त्या वनस्पतींना कचरा समजून बसतो. ह्याच वनस्पतींच्या माध्यमातून औषधी निर्माण करणाऱ्या कंपन्या योग्य उपयोग करून लाखो रुपये कमवितात. ग्रामीण भागात उपलब्ध असणाऱ्या वनस्पतींच्या उपयोगाबाबत, ग्रामीण जनता अनभिज्ञ असल्याने त्याचा जोड-व्यवसायासारखा उपयोग करत नाही. पर्यायाने औषधी खरेदी करतांना अनावश्यक किंमत मोजावी लागते. सहजतेने उपलब्ध होणाऱ्या वनस्पतींच्या […]

वराहकणींचे झाड, शेतकर्‍यांना मिळवून देईल घबाड !!!

विविध ताकदवान औषधांच्या निर्मितीत वापरली जाणारी, अश्वगंधा ही झुडूपवर्गीय वनस्पती असुन, सामान्यता भारतात मध्यप्रदेश व महाराष्ट्रात आढळून येते. भारताशिवाय स्पेन, मोरोक्को, इस्त्राईल, बलुचीस्थान व पूर्व आफ्रिकन देशांमध्ये उत्पादित केली जाते. ह्या वनस्पतीच्या झाडाला हातावर घासले असता घोड्याच्या मुत्रासारखा हिचा गंध येतो. […]

चमत्कारिक औषधी वनस्पती अगस्त !

प्राचीन भारतीय आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये हजारो वनस्पतींची माहिती व त्यांचे उपयोग दिलेले आहेत, परंतु पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाने भारावून गेलेल्या तथाकथित विद्वानांनी, ‘भारतीय ते त्याज्य आणि पाश्चात्य ते पूज्य अशी भ्रामक कल्पना रुजविल्याने भारतीय शास्त्र मागे पडत गेलीत.’

महागड्या एलोपेथिक उपचारांची वारंवार पुनरावृत्ती करूनही जे विकार बरे होत, नाही ते विकार आयुर्वेदातील सामान्य वनस्पतींच्या वापराने बरे होतात. फक्त यासाठी तज्ञ आणि अनुभवी वैधकीय मार्गदर्शकाची गरज आहे. वनस्पतींमध्ये निसर्गाने चमत्कारिक क्षमता भरून ठेवलेली आहे, या क्षमतेचा पुरेपूर आणि डोळसपणे वापर करणे आवश्यक आहे.

” वृषागस्तयो: पुष्पाणि तिक्तानि, कटूविपकानि क्षयाकासहरानि च |

अगस्तयं नातिशितोष्णम नक्तान्धानां प्रशस्यते || ” (सुश्रुत सूत्र. )

प्राचीन भारतीय ज्ञानाचा उपयोग जर, रोगोपचाराबरोबर राष्ट्रविकास आणि आर्थिक उन्नतीसाठी करता आला तर हा दुग्धशर्करा योगच ठरेल. […]

शेवगा एक औषधी तसेच फळभाजी वनस्पती !!!

दिवसेंदिवस पर्जन्याचे प्रमाण कमी होत आहे तसेच भूगर्भीय जलसाठ्याचे प्रमाणही कमी होत आहे. अशा स्थितीत शेती हा व्यवसाय जुगार बनत चालला आहे. कमी पाण्यावरही उत्पादन देणारे पिक म्हणजे शेवगा होय . कमी पाणी तसेच कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे हे पिक शेतकऱ्यांना वरदान ठरू शकते. […]

कृषी कर्मयोगी दादासाहेब बोडके

सोलापुर जिल्ह्यातील अनगर गावातील दादासाहेब बोडके हे एक कर्तबगार शेतकरी आहेत. अल्पशिक्षित असले तरी शेतीच्या विद्यापीठात पीएच.डी शोभतील असे दादांचे कर्तृत्व आहे. त्यांनी आपल्या शेतीत असंख्य प्रयोग केले. अनेक पिकांची लागवड केली. शेडनेट, पॉलीहाऊस आदी तंत्रे आत्मसात केली. […]

1 10 11 12 13 14 16
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..