नवीन लेखन...

भावुक मनांतर

आले कोवळे किरण कांचनी
चराचर सारे , सुखात नाहले…

भावनांच्या कळ्या उमलल्या
अधरी शब्दलाघव ते प्रसवले…

रिमझिमणाऱ्या, श्रावणधारी
कृष्णमेघ सावळे बरसबरसले

हिरवळलेल्या या तृणांकुरातून
चैतन्य जीवा तोषवित राहिले…

लागताच चाहुल विश्वंभराची
रूप ब्रह्मांडाचेही भारावुन गेले…

झरझरता श्रावण आत्मरंगला
स्वर शब्दमार्दवी दाटुनी आले…

व्याकुळता, अंतरीची निरागस
मन दिगंतरी सारे भावुक झाले…

–वि.ग.सातपुते .(भावकवी)

9766544908

रचना क्र. १८७

४/८/२०२२

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..