नवीन लेखन...

बालमनाला सांभाळणे आवश्यक

आपल्या प्रत्येकाच्याच लहानपणी आपण अनुभवलेले प्रत्येक दिवस आनंददायी ठरत असंत. लहानपणातलं आपलं निष्पाप बालमन त्यामुळेच सतत उत्साही असायचं. अगदी शाळेतले दिवस असतील, अभ्यास न केल्यामुळे घरच्यांचा खाल्लेला ओरडा असेल, अथवा मोठ्या भावंडाबरोबर झालेलं भांडण असेल; तरीही त्याचा कोणताही खोलवर परिणाम अंतर्मनावर फारसा होत नसे. भांडणे झाली तरीही काही वेळातच पुन्हा एकत्र येऊन खेळणे सुरु व्हायचं. पुन्हा आनंदी वातारवणात उरलेला दिवस मावळायचा. एकत्र असणं अथवा येणं हेच खरं तर त्या आनंद निर्मितीच्या मागचं कारण असायचं. हल्लीच्या व्हर्च्युअल जगात संवाद आणि सहवास दोन्हीही इतिहासजमा होत चाललं आहे. संवाद होतो म्हणा तसा, पण व्हर्च्युअल पद्धतीने, प्रत्यक्ष भेटून अथवा फोनवर बोलूनही नाही, तर व्हॉटस् अॅपद्वारे. त्यामुळे सहवासाचा तर प्रश्नच येत नाही.

मी आणि माझं, आपण आणि आपलं या वैचारीकतेमुळे कुटुंबातील सदस्यांनी आपल्या स्वतः भोवती जणू लक्ष्मणरेषा आखून घेतल्याप्रमाणे वर्तन आणि विचार अंगीकारल्याचं दिसत आहे. सामाजिकदृष्ट्या आपणच आपलं अध:पतन तर करत नाहीत ना, हा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

आपलं नातं इतकं संकुचित ठेवण्याची कदाचित अनेकविध करणेही असतील. ती कारणे प्रत्येकाची भिन्न देखील असतील. पण निर्माण होणाऱ्या दुराव्याला जबाबदार कोण?  ह्याचा बालमनावर काय आणि किती खोलवर परिणाम होऊ शकतो हे आपण समजू शकणार का? आणि कधी? अर्थात प्राप्त परिस्थितीचा विचार करून ह्यावर योग्य मार्ग काढणं महत्वाचं आहे. सुयोग्य पर्याय निवडून बालमनाला सांभाळणे आवश्यक असतं.

– विद्यावाचस्पती विद्यानंद

Email: vidyavachaspati.vidyanand@gmail.com

Avatar
About विद्यावाचस्पती विद्यानंद 32 Articles
शिक्षण तज्ज्ञ, जेष्ठ पत्रकार, लेखक, साहित्यिक, व्याख्याते, स्तंभ लेखक, कवी, व्याख्याते, अभिनेते, मानसशास्त्रीय समुपदेशक, करिअर आणि आध्यात्मिक मार्गदर्शक. एकूण १८ पुस्तकांचे लेखन (पैकी ६ क्रमिक पाठ्य पुस्तके गेल्या ६ वर्षांपासून विद्यापीठातील अभ्यासक्रमासाठी उपलब्ध), २००० पेक्षा अधिक लेखांना विविध माध्यमांतून प्रसिद्धी, ३० वर्षे शैक्षणिक क्षेत्रांत प्राध्यापक, प्राचार्य आणि संचालक म्हणून योगदान, ३५ वर्षे वैविध्यपूर्ण व्यवसायातील अनुभव, निरनिराळ्या विद्याशाखांमधून एकूण २८ पदवी व पदव्योत्तर शिक्षण तसेच २ विषयांमध्ये पी. एच. डी. (मानसशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र), सद्यस्थितीत तिसऱ्या पी. एच. डी. चे (आध्यात्म विषयांत) काम सुरु.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..