नवीन लेखन...

बालमनाची निरागसता

बालमन अत्यंत निरागस असतं, हे आपल्याकडून केवळ बोललं जातं; पण त्याचा अनेकदा आपल्या विचारांत आणि वर्तनांत उपयोग केल्याचं दिसून येत नाही. बालमन हे अनुकरणप्रिय असतं; निरपेक्ष, निरागस, नि:स्वार्थी आणि निरपराधी असतं. केवळ अनुकरणप्रिय पिंडानुसार ते सभोतली घडणाऱ्या घटना, घडामोडी याचं निरीक्षण करून त्याचं अनुकरण करत असतं. ह्या बालमनाला सकारात्मक वातारणात वाढवणे आवश्यक असतं. ज्यायोगे घडणाऱ्या घडामोडी ह्यादेखील सकारात्मकच असल्याची प्रचीती येत राहते.

जेव्हा आपण नातं आणि व्यवहार एका तराजूत तोलायला लागतो,  तेव्हा परस्परांमधील संबंध काही अंशी बिघडायला ते कारणीभूत ठरतं. अशा प्रकारच्या नात्यांतील, प्रत्येकानं परस्परविरोधी, व्यावहारिक विचार सुरु केला की, आपापसात दूरी निर्माण होते आणि कालांतरानं त्याचं दरीत रुपांतर होतं. आणि मग अशी नाती संपुष्टात येतात. ह्या घडामोडींचा थेट परिणाम बालमनावर होत असतो. बालमन निष्पाप असतं, त्या मनाला खरं-खोटं, चांगलं-वाईट, आपलं-परकं, जवळचा-लांबचा ह्यांतील फरक समजण्याइतकं ते परिपक्व झालेलं नसतं. हे असं चित्र हल्ली अनेक कुटुंबात दिसू लागलं आहे. हा दुरावा निर्माण होण्यास कोण जबाबदार आहे?  यापेक्षा काय कारणीभूत आहे याचा विचारपूर्वक शोध घेणं जरुरीचं असतं.

निर्माण होणारी परिस्थिती ही केवळ मानसिक कारणांमुळेच अधिक असते. आपापल्या मनाच्या मर्यादा लक्षात न घेतल्याने अनेक प्रसंग निर्माण होतात. या प्रतिकूल परिस्थितीत कोण चुकत आहे?  यावर भर दिला जातो आणि नेमकं कारण काय असू शकतं? की ज्यामुळे परिस्थितीतील अनुकुलता संपुष्टात आली,  याची जाणीव होत नाही.

– विद्यावाचस्पती विद्यानंद

Email: vidyavachaspati.vidyanand@gmail.com

Avatar
About विद्यावाचस्पती विद्यानंद 32 Articles
शिक्षण तज्ज्ञ, जेष्ठ पत्रकार, लेखक, साहित्यिक, व्याख्याते, स्तंभ लेखक, कवी, व्याख्याते, अभिनेते, मानसशास्त्रीय समुपदेशक, करिअर आणि आध्यात्मिक मार्गदर्शक. एकूण १८ पुस्तकांचे लेखन (पैकी ६ क्रमिक पाठ्य पुस्तके गेल्या ६ वर्षांपासून विद्यापीठातील अभ्यासक्रमासाठी उपलब्ध), २००० पेक्षा अधिक लेखांना विविध माध्यमांतून प्रसिद्धी, ३० वर्षे शैक्षणिक क्षेत्रांत प्राध्यापक, प्राचार्य आणि संचालक म्हणून योगदान, ३५ वर्षे वैविध्यपूर्ण व्यवसायातील अनुभव, निरनिराळ्या विद्याशाखांमधून एकूण २८ पदवी व पदव्योत्तर शिक्षण तसेच २ विषयांमध्ये पी. एच. डी. (मानसशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र), सद्यस्थितीत तिसऱ्या पी. एच. डी. चे (आध्यात्म विषयांत) काम सुरु.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..