नवीन लेखन...

अवकळा

आभाळ ढगांनी
दाटलेले होते,
पावसांच्या सरी
कोसळतील
या आशेने
सारे सिवार
बहुरंगी नटलेले होते.

नांगरण – कुळवनाने,
माती आता
चांगलीच पेटली होती,
लाले-लाल
मातीची आग,
आता तळपायातून
मस्तकी पोहचली होती.

खर्चाचे डोंगर,
आता चांगलेच
जीवावर बेतले होते,
बेताल जीवनाने
मरनोत्तर गोष्टीत
आज चांगलेच
रस घेतले होते.

दऱ्या – खोऱ्यातून
नदी- नाल्यातून
तळी – ओढ्यातून
आपुलकी, जिव्हाळ्याचे
पाणी….
आता बऱ्यापैकी
आटले होते.
कठोर – निर्दयी
दुष्ठ – नीतीने
सुख – दुःखाला
मधो – मध
चिरले होते.

पाखंडी, भ्रष्ट
झुंड, शंड
ठोक, बिनडोक
मनमानी, मनोवृत्तीने
सुव्यवस्थेस,
आता चांगलेच
घेरले होते.

मळे, धन–दांडग्याचे,
आता चांगलेच
फुलले होते,
अवकाळाने
झोडपले तरी,
व्यवस्थेने मात्र..
हात जोडले होते.

दुःखाचे धनी,
नशिबाने चांगलेच,
होरपळले होते,
कितीही हात
जोडले तरी,
व्यवस्थेने पायदळी
तुडविले होते.

न्यायाचेच हात
आज डोळ्यादेखत ,
रक्ताने माखलेले होते,
भ्रष्ट नोकरशाहीपुढे, आज
सत्य हि झुकलेले होते…

– ©️ प्रा. शिवाजी आर. कांबळे (कवि, लेखक, संमिक्षक, संपादक, गीतकार)
☎️ मो.न.8830800335 ================================
Follow me on my Blog ID: https://kshivraj83.blogspot.com/ ================================

Avatar
About प्रा. शिवाजी आर. कांबळे 4 Articles
(कवि, लेखक, समिक्षक, संपादक, गीतकार इ.)
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..