नवीन लेखन...

गुंतवणूक – पोर्टफोलिओ आणि सोने

देशात पुरेसा पैसा चलनात असला तर उपभोगासाठी त्याचा वापर करून काही रक्कम बचत केली जाऊ शकते. या बचतीने बँकातील ठेवी वाढतात आणि त्यामुळे बँका अधिक कर्ज देऊ शकतात. उपभोक्ते, उद्योजक, शेतकरी, व्यापारी यांना अधिक कर्ज मिळाल्याने अधिक उत्पादन, अधिक विक्री आणि अधिक निर्यात शक्य होते.आणि त्यातू देशाची आर्थिक प्रगती साधता येते. […]

जीवन त्यांना कळले हो

लौकिक अर्थाने आयुष्याची संध्याकाळ झाली असताना हे ज्येष्ठ दुसर्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाची पहाट उगवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शरीराचे वाढते वय किंवा दर वर्षीच्या जन्मतारखा या ज्येष्ठांच्या मनातले तारुण्य कधीच संपवू शकणार नाहीत. खरे तर त्यांना पाहून वृद्ध किंवा ज्येष्ठ म्हणणे ही बरे वाटत नाही. कारण व्योमनाप्रमाणे शरीर सोडले तर त्यांच्या उत्साहात, समजशीलतेत, बुद्धिमत्तेत तीळमात्र फरक पडला नाही. […]

भय इथले संपत नाही

लाओ त्से हा चीनी तत्त्वज्ञ म्हणतो आपण जितका लांब प्रवास करावा, तितकं आपल्याला कमी कमी कळत जातं. हे आपण लक्षातच घेत नाही आणि इथेच आपलं भय वाढीला लागते. जग जितकं पचवावं – रिचवावं तितकंच नेमकं अंगी लागतं. वृद्ध हा शब्दच संस्कृत भाषेत ज्ञानी या अर्थानं आलेला आहे. रशियन चित्रपट आहे द रिटर्न नावाचा. यात वडील अनेक […]

पर्यटन आणि संरक्षण

कुठेही प्रवासाला जायचं ठरवलं की एक अनामिक हुरहूर मनाला लागते. जायचा दिवस जवळ आला की आपली तयारी सुरू होते. कपडे कुठले घालायचे, बॅग कुठली न्यायची यापासून खरेदी काय करायची याचे बेत मनात आखायला सुरवात होते. परदेशी जाण्यासाठी व्हिसा मिळेल की नाही यापासून तिथल्या चलनात करायच्या खर्चाचे गणित सुरू होते. हे करत असताना प्रवासाचा दिवस उजाडतो आणि आपण घराबाहेर पडतो. […]

कोकणातील बंदरे

दाभोळ, जयगड, रत्नागिरी, रनपार, मुसाकाझी, विजयदुर्ग, देवगड, मालवण अशा सर्वच बंदरातून या प्रवासी आगबोटी येता जाता थांबत होत्या आणि प्रवाशांची बंदरांवर वर्दळही होती. त्याकाळी किनारपट्टीवरील लहान लहान खाड्यांमधून गलबते व मचवे गर्दी करून असत. रेशनवरील तांदूळ, गहु, जोंधळा अशा अन्नधान्यातून मीठ, लाकूड, मंगलोरी कौले अशा सर्व स्तरावरील मालवाहतूक लहान-मोठ्या बंदरांतून गलबतांद्वारे मोठ्या  प्रमाणात होत असे. […]

नवतारुण्याची प्रगल्भ डहाळी

वर्तमानात वयाची वाढ तर थांबवता येत नाही नि निसर्गाने ठरवलेले श्वास तर घ्यावेच लागणार असतात. मग हेच जर सत्य आहे, तर ते सत्य ‘सुंदर’ का करायचे नाही? ज्या प्रज्ञेने वैज्ञानिक झेप घेऊन चंद्र काबीज केला, त्याच प्रज्ञेने हे ज्येष्ठपण अधिकाधिक सुसह्य, आनंदमय का करता येऊ नये? स्वानंदी सुरेल व ‘भाव’ जपून नवी ज्येष्ठालये उभारणे, आता जाणिवेने […]

कोकणची माती आणि तिचे संरक्षण

कोकणच्या मातीमध्ये रुजणारे हे सर्व वृक्ष या भागाला समृध्दी तर देतीलच पण वृक्षांच्या उत्पादनावर आधारित शेकडो कुटिर उद्योग कोकण भूमीला स्वयंसिद्धतेकडे स्वावलंबनाच्या महाद्वारामधून घेऊन जाऊ शकतात. कोकणच्या मातीचे संरक्षण करावयाचे असेल तर या भूभागाचा विकास तेथील निसर्गाला बरोबर घेऊनच करावयास हवा. […]

योग: कर्मसु कौशलम्

कर्माच्या दोरीवरून चालताना दुसर्या बाजूचा तोलही सांभाळावा लागतो. ही दुसरी बाजू अपेक्षांची! मी एवढं केलं सगळ्यांसाठी पण कुणाला काही नाही त्याचं. साधं थँक्यू म्हटलं नाही. ..वाईट वाटतं. अगदी खरं आहे. पण हळूहळू ते वाईट वाटणं ही कमी व्हायला हवं. कारण ते वाईट फक्त आपल्याला वाटत असतं. ज्याला ते कळायला हवं त्याच्या ते गावीही नसतं. ‘योग: कर्मसु […]

कोकणातील वन्यजीव,त्यांचे संरक्षण

गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर उगम पावणारी ही पर्वतरांग महाराष्ट्र गोवा, कर्नाटक, केरळ राज्यांमधून जाताना 1600 कि.मी. अंतर कापते. हीच पर्वतरांग केरळात समुद्राखाली जाऊन श्रीलंकेत प्रकट होते. ही पर्वतरांग उभा आडवा विस्तार मिळून सुमारे 16 लक्ष चौरस कि.मी.चा भाग व्यापते. […]

वार्धक्याच्या वळणावर

वार्धक्यावस्थेचे नियोजन करणे आज गरजेचे झाले आहे. या नियोजनामध्ये सर्वात महत्त्वाचे ठरते ते आर्थिक नियोजन. त्यामुळे सुरुवातीपासूनच आर्थिक शिस्त अंगी बाणवून घेणे अत्यावश्यक ठरते. त्यामुळे निदान आर्थिक परावलंबित्वापासून सुटका होणे शक्य आहे. आर्थिक स्वातंत्र्य आणि शारीरिक स्वावलंबन हा आदर्श वार्धक्याचा पाया आहे. हल्लीच एका परिचित वृद्ध स्त्रीच्या मृत्युपत्रावर साक्षीदार म्हणून सही केली. निघताना वकील मैत्रिणीनं त्यांना […]

1 13 14 15
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..