नवीन लेखन...

विज्ञानयुगात धर्माची आवश्यकता

‘जो धारणा करतो तो धर्म’ अशी धर्माची व्याख्या केली जाते. त्यातून समाजसुधारणेसाठी, तो सुव्यवस्थित चालावा यासाठी धर्म आहे हे सूचित होते, पण कित्येक वेळा धर्मातील अनिष्ट रूढींमुळे किंवा धर्मामधील भांडणामुळे समाजाची घडी विस्कटते. त्याची प्रगती खुंटते. तेव्हा आजच्या या विज्ञानयुगात धर्म आवश्यक आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. […]

मनाचा धाक

नुकतीच एका ऑफिसमध्ये गेले होते. एरवी दुसऱ्या मजल्यावरच्या या ऑफिसमध्ये जाताना नेहमी जाणवायचं, जिन्यातले कोपरे लोकांनी पान खाऊन थुंकून घाण करून टाकलेत. […]

माहेर

‘कौसल्या’ स्वतःचा खर्च स्वतः चालवण्याला समर्थ होती. कारण ‘कौसल’ देशाचं उत्पन्न तिच्या मालकीचं होतं असं म्हणतात. रामाला ‘कोसलपती’ हे नाव कौसल्येकडून मिळालेल्या राज्यामुळे पडलं असावं. स्त्रियांचा माहेरावरचा अधिका विवाहानंतरसुद्धा शाबूत राहात असावा. […]

संस्कारांच्या भिंती

कथा म्हटलं की त्यात ‘नायक’ आला आणि ‘नायक’ नेहमी शुर,पराक्रमी वगैरे असायचाच. मग तो परंपरागत महाकाव्यांचा नायक असू दे किंवा आजच्या चित्रपटांचा ! मात्र या दोन्ही नायकांमध्ये बराच फरक असतो. आपल्या प्राचीन महाकाव्यांचे नायक हे अन्यायाविरुद्ध लढणारे असायचे. त्या त्या काळातल्या आसुरी शक्तींविरुद्ध त्यांनी हातात शस्त्रही घेतलं. पण लढणं आणि मारणं एवढाच त्यांच्या शौर्याचा निकष नाही. […]

विवाह संस्था

उंची वस्त्रं, दागदागिने, शृंगार, आराम, संपत्ती यापैकी कशाचंच या आश्रमाला वावडं नाही. पण त्याचबरोबर या आश्रमावर जबाबदायाही तितक्याच समाजातील बालकं आणि वृद्ध यांच्या संरक्षणाची जबाबदारी गृहस्थाश्रमाची संन्यासाश्रमातील ईशसेवा आणि जनसेवा करीत राहणाऱ्या विरक्तांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी गृहस्थांनीच पाहायची. आयुष्यातल्या या हक्काची आणि कर्तव्याची जाणीव आपल्या विवाहविधीमध्ये पुरेपूर करून दिली जाते. […]

उपनयन विधी

नुकतीच मैत्रिणीच्या मुलाची मुंज झाली. आपण केवढा प्रचंड खर्च केला हे ती मोठ्या कौतुकानं सांगत होती. देण्याघेण्याच्या साड्या, घरच्या लोकांचे उंची कपडे, व्हिडिओ कॅसेट… खर्चाच्या अशा असंख्य वाटा… याला पर्याय म्हणून दुसरी मैत्रीण सांगत होती ‘छे! माझा असल्या विधींवर विश्वासच नाही!’ आणि मी विचार करू लागले. जुन्या काळानुसार आठवं वर्ष हे मुलाचं विद्यार्जन सुरू करण्याचं वर्ष. या विद्यार्जनाची सुरुवात मुंज किंवा उपनयन संस्काराने होई […]

आपण आपल्याशी

साधनाच्या अधीन असलेल्या प्रत्येक सुखाला भारतीय संस्कृतीने कमी महत्त्वाचं मानलं. कारण सुखाचं साधन जवळ असल्याचं सुख जेवढं मोठं, तेवढंच ते साधन नष्ट झाल्याचं, हरवल्याचं दुःखही मोठं ! टी. व्ही., रेडिओ, कॅसेट प्लेअर, व्हिडिओ अशी असंख्य करमणुकीची साधनं आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंग बनलीत आणि त्यात फारसं गैर काही नाही. उलट काही प्रमाणात ते अपरिहार्यच आहे. रोजचं जीवन दिवसेंदिवस अधिकाधिक धकाधकीचं, चिंतेचं बनतं आहे. […]

निसर्ग सखा

निसर्गाकडून माणूस खूप काही घेत असतो. हवा, पाणी, प्रकाश याबरोबरच अन्नधान्य, फळं, फुलं, औषधं, वस्त्र, दागिने अशा साऱ्या गोष्टी निसर्गाची देणगी आहेत. मानवी जीवन सुखमय व्हावं, म्हणून भारतीय संस्कृतीतील ऋषि-मुनींनी निसर्गाचा खूप उपयोग केला. हे ऋषी म्हणजे नुसते ‘देव-देव’ करणारे आणि यजमानापुढे वाकणारे भिक्षुक नव्हते. […]

संस्कार, विचार आणि विवेक

सामाजिक बदलांचा आणि आर्थिक विकासाचा वेग जसजसा वाढत चालला, तसतसं माणसाचं राहणीमान झपाट्यानं उंचावत चाललं. विज्ञानानं असंख्य सुखसुविधा निर्माण केल्या. शिक्षणाचा प्रसार वाढला. ज्या समाजात ‘व्ह. फा. ‘पर्यंत शिकणाऱ्या मुला-मुलींकडे लोक आदरानं बघत होते, त्याच समाजात घरोघरी पदवीधर दिसू लागले. जास्तीतजास्त उच्च शिक्षण घेतलेला, नोकऱ्यांमध्ये मानाच्या जागा मिळवणारा आणि आर्थिक दृष्ट्या संपन्न असा एक नवा वर्ग, उच्च मध्यमवर्ग निर्माण होऊ लागला. […]

संस्कृती रक्षण

संस्कृती ही माणसाच्या वर्तनात असते. सदाचरणात असते. माणूस अतिलोभी, मत्सरी असेल तर तो सदाचारी असू शकत नाही. त्याच्यातले हे दोष घालवण्याचं काम धार्मिक स्तोत्रं मग ती कोणत्याही धर्माची असू देत करत असतात. म्हणून लहानपणापासून संस्कारक्षम, पापभीरु वयापासून त्यांची शिकवण द्यायची. […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..