नवीन लेखन...

महिलांसाठीचे कायदे

समाजात महिलांना सन्मानाने जगता यावे व त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर कायदयांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायदयांचा एक आढावा.
[…]

शब्दाचे मोल….!

शब्दासाठी कर्णाने कवचकुंडल दिले

सत्य हरिश्चंद्राने राज्त्य्ग केले,

मर्यादा पुरुषोत्तम गेले वनवासी

शब्दानेच प्रसिद्ध ‘ महाभारत ‘ घडविले !
[…]

महिला : लोकशाही व शिक्षण ……

स्त्रीच्या प्रगतीचा विचार करत असताना एकच दिसून येईल की, समाजात जसे-जसे शिक्षण वाढत गेले त्याबरोबरच स्त्री माणूस होण्याचा प्रयत्न करू लागली. स्त्री साहित्यात येऊ लागली ती राणी, पत्नी, बायको म्हणून नव्हे तर नायक म्हणून. यातूनच स्त्रियांना अस्मितेची जाण झाली आणि जीवन जगत असताना सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात स्त्रियांना महत्त्वाचे स्थान असावे, त्यांचा माणूस म्हणून विचार व्हावा ही धारणा समोर आली. त्यातून साहित्यातून स्त्री स्वातंत्र्याच्या छटा उभ्या राहू लागल्या आणि…….
[…]

बंजारा समाजातील होलिकोत्सव

प्राचीन काळापासून दर्‍याखोर्‍यात वावरणार्‍या बंजारा समाजाचा इतिहास बंजारा लोकसंस्कृतीमधून दिसून येतो. बंजारा समाजाचा होळी उत्सव म्हणजे ग्राम रंगभूमीवरील टोटल थिअटरचा अविश्कार म्हणावा लागेल.
[…]

पर्यावरण रक्षण,जगण्याचे शिक्षण….!

विविध पक्षी व प्राण्यांच्या जाती पाहण्यासाठी आज प्राणीसंग्रहालयात जाऊन पाहावे लागते.चिमण्या,गिधाड,कावळे,माळढोक,कौंच,साप,माकड,वाघ, चित्ता असे विविध प्राणी अस्तित्वाची लढाई लढत आहेत.दररोज वर्तमानपत्रांमध्ये रकानेच्या रकाने भरून जागृती केली जाते,पण वेळ आहे कुणाला ही मानसिकता पाहायला मिळते.आपल्या डोळ्यासमोर विविध पक्ष्यांची सरेआम विक्री केली जाते,थोडावेळ हळहळ व्यक्त करून मोकळे होण्याचे दिवस आता गेलेत.पक्षी व प्राणी यांची तस्करी तसेच विक्री करणाऱ्यांच्या हालचालींवरही सामान्यांनी कटाक्षाने नजर ठेवली पाहिजे.

सजीवांच्या उपयोगाबाबत बोलायचे झाल्यास कितीतरी उदाहरणे देता येतील,पिकांवर येणारी टोळधाड आणि लष्करीअळी चिमण्यांच्या माध्यमातून नियंत्रित केली जाते,पोलिओवर लस बनविण्यासाठी आवश्यक जीवाणू माकडाच्या मूत्राशयात मिळतो,सापांच्या माध्यमातून पिके नष्ट करणाऱ्या उंदरावर व पर्यायाने प्लेग सारख्या रोगावर नियंत्रण केले जाते,अन्थ्राक्ससारख्या महाभयंकर रोगाच्या ‘करीअन’ या विषाणूला आला घालण्याचे सामर्थ्य गिधाडांमध्ये आहे,कुत्र्यापासून पसरणाऱ्या ‘जलसंत्रास’ या रोगावरील लस मेंढी आणि कोंबडीच्या गर्भाशयापासून बनविली जाते.
[…]

कसाबदादा, कसाबदादा !!!

आमच्याकडे पूर्वी सिनेमांचे आठवडे मोजले जायचे. १००-१०० आठवडे चालणारे सिनेमापण होते तेव्हा. आता ते दिवस नाही राहिले रे… पण तू मात्र १०० आठवड्यांचा झालास आमच्याकडे. आमच्याकडे आलेला प्रत्येक पाहूणा आमचा खास पाहूणचार घेतल्याशिवाय घरी जाउच शकत नाही. अगदी वर्षानुवर्ष तू आमचा पाहूणा बनून रहा. कोणीही तुला काहीही बोलणार नाही.
[…]

आज लोकमान्य टिळक असते तर………

आज ग्रामीण भारतातील शाळांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. शिक्षकांच्या आणि शालेय सोयीच्या नावाने न बोललेले बरे. अपुरी शिक्षण सामुग्री, जीवन जगण्याची धडपड, दोन वेळच्या जेवणाची परवड आणि अश्या वेळी संपूर्ण भारत भर एकच परीक्षा. आज लोकमान्य टिळक असते तर त्यांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? ठणकावून विचारले असते……. पण आजच्या पेड न्यूज च्या जमान्यात हा लोकशाहीचा रक्षक असलेला स्तंभ सुद्धा भक्षक झाला आहे.
[…]

माझा गाल

मी दिले तिला कमळचे फुल

मला वाटले तीही उड़विल प्रेमधुल

हातात घेउनिया कमळ तो लाल

चटकन सुजविला तिने माझा गाल ||२||
[…]

1 159 160 161 162 163 219
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..