नवीन लेखन...

अलक

मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. दुपारी अडीच तीनची वेळ. कर्जतकडे जाणारी लोकल प्लॅटफॉर्मवर उभी होती. सुटायला वेळ होता आणि सिग्नलही लाल होता. सगळ्यात पुढच्या डब्याच्या सगळ्यात पुढच्या दरवाजात साठीच्या जवळ आलेले प्रभाकरपंत उभे होते. सिग्नल न्याहाळत.

थोड्याच वेळात एक मुलगी पाठीमागून चालत आली. वय तीस ते पस्तिसच्या आसपास. अंगात जीन आणि टी शर्ट. खांद्यावर छोटीशी बॅग. डोळ्याला फिकटसा गॉगल. चालत चालत गाडीच्या पुढे गेली. वळून गाडीचा बोर्ड बघितला. मागे वळली, आणि मोटरमनच्या केबिनमधे शिरली. सिग्नल अजूनही लालच.

काहीतरी विचार करून प्रभाकरपंत खाली उतरले. मोटरमनच्या केबिनजवळ गेले, आणि तिच्याकडे पाहू लागले. नजरेतून कौतुक ओसंडून वहात होतं.

“काय पाहताय काका?”

“तुमचं कौतुक वाटलं म्हणून पुढे यावंस वाटलं. तुम्हाला सांगायला.”

“कसलं कौतुक?”

“मुलगी असून ट्रेन चालवताय.”

“हूं.”

“तुम्हाला पाहून लेकीची आठवण झाली.”

“का?”

“ती पण डीझेल लोको पायलट आहे. नागपूरला असते. सध्या नागपूर – दिल्ली किंवा नागपूर – चेन्नई अशी तामिळनाडू एकसप्रेस चालवते. मुंबईकडे आली तर भुसावळ पर्यंतच. पुढे नाही. वर्षांवर्षांत भेट नाही. तुम्हाला पाहून ती भेटल्यासारखं वाटलं, म्हणून पुढे आलो. दोन शब्द बोललो. खूप बरं वाटलं.”

“काका, सिग्नल झालाय. बसताय का गाडीत?” पंतांकडे न पहाता तिने विचारलं.

हो म्हणून पंत वळले. त्यांनी हळूच पुसलेले डोळे तिला डोळ्यांच्या कोपर्यातूनही तिला दिसले.

गार्डाकडून आलेला दोन बेलचा सिग्नल ऐकून तिने हॉर्न वाजवला आणि गाडी सुरू केली. दोन थेंब तिच्याही डोळ्यतून ओघळले. मोटरमनच्या रुक्ष आयुष्यात, ड्यूटीवर असतांना वडिलांच्या मायेनं बोलणारं कुणीतरी तिला प्रथमच भेटलं होतं.

संजीव गोखले, पुणे.
१० एप्रिल २०२३.

Avatar
About संजीव सदाशिव गोखले 8 Articles
मी ज्येष्ठ नागरिक असून अधून मधून लिहित असतो, नियमित लेखक होण्याची मनीषा असली तरी अजून झालेलो नाही. यापूर्वी मी आनंदवन हेमलकसा सोमनाथ प्रत्यक्ष पाहिल्यावर त्याबाबत फेसबुक वर लिहिले आहे. माझ्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेबद्दल मी केलेले लेखन ""ब्रह्मांड – एक आठवणे"" या शीर्षकाखाली दैनिक सकाळच्या मुक्तपीठ या सदरात प्रसिद्ध झाले आहे. २००४ साली मी मुंबई पोर्ट ट्रस्ट मधून स्वेच्छा निवृत्त झालो.तेंव्हापासून वास्तव्य पुणे. थोडीफार लेखनाची आवड आहे. कोणत्या एखाद्या खास विषयावर नाही, जे सुचेल ते लिहितो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..