नवीन लेखन...

आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग दोन

एकेकाळी सोने की चिडीयावाला असलेला भारत देश गेला कुठे ?

दरडोई १७००० एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले कर्ज फेडायचे कुणी, कसे, आणि कधी ?

इंग्रजानी त्यांना राज्य करण्यासाठी आपल्यावर लादलेले आणि आज कालबाह्य झालेले कायदे बदलायचे कुणी ?

इंग्रजांनी आपल्याला गुलाम बनवण्यासाठी केलेल्या कायद्याच्या आधारे जो मिळतो तो न्याय योग्य असेलच असेही नाही. मग हे बदलायचे कुणी ?

नीती, धर्म, आणि हिंदु सभ्यतेचे सर्व नियम मोडून, नको तो व्यभिचार रोज घरात मिडीयाच्या माध्यमातून पहावा लागतोय, बदलायचं कुणी ?

ज्याचा भविष्यात काडीमात्र उपयोग होत नाही, हे माहिती असणारे किमान सत्तर ते ऐशी टक्के कालबाह्य शिक्षण देऊन आयुष्याच्या उमेदीतील अत्यंत महत्त्वाची काही वर्षे फुकट घालवायची का ?

चुकीच्या दिशेने चाललेली आपली शिक्षण व्यवस्था बदलायची कुणी ?

विषारी रासायनिक खतांचा भडीमार झालेल्या पालेभाज्या, कृत्रिमरीत्या पिकवलेली फळे आणि नसत्या ग्लोबलायझेशनच्या नावाखाली, नसती भुरळ पडून, स्वतःच्या आरोग्याला पणाला लावत, डुकरांसाठी असलेले सोयाबीनसारखे पाश्चात्य कडधान्य आणखी किती दिवस खायचे ?

म्हणजे न्यायव्यवस्थेत आपण गुलाम.

देश चालवायची पद्धत देखील गुलामीचीच.

अर्थव्यवस्था गुलामीचेच प्रतिक.

शिक्षण व्यवस्था इंग्रजांचीच देणगी.

पारंपारिक भारतीय शेतीचा बट्याबोळ
आणि त्यामुळे बिघडलेले आरोग्य.

पुनः आरोग्य प्रस्थापीत करण्यासाठी जी औषधे हवीत ती विदेशनीतीवर आधारीत, कायम स्वरूपात, मरेपर्यंत घेण्याचीच !
म्हणजे आपले जगणे आणि मरणे देखील अभारतीय झालेले आहे. याला पर्याय एकच!

पुनः भारतीय पद्धतीने विचार करायला शिकायचे.
अगदी आयुर्वेदाचा अभ्यास सुद्धा पुनः एकदा नव्याने, पुनः एकदा पूर्णपणे भारतीय पद्धतीने अभ्यासले गेला पाहिजे.

याचा अर्थ असा नाही की, पाश्चिमात्य ते ते सर्व वाईटच !
आणि आयुर्वेद शिकायचा म्हणजे नवीन तंत्रज्ञान, विज्ञान अभ्यासायचेच नाही.

यांचा योग्य तो मेळ घालतघालत आपल्याला पुढे जावे लागणार आहे. शेवटी आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला जपायचं आहे. आमची पिढी जे दुःख भोगतेय, जी औषध खाऊनच जगतेय, तीला आपल्याला, आताच्या औषधांच्या संभाव्य धोक्यापासून वाचवायचं आहे. शेवटी समर्थ भारताचा भार यांच्याच खांद्यावर द्यायचा आहे ना !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..