नवीन लेखन...

महागाईशी मुकाबला

A fight with Inflation

महागाई म्हणजेच Inflation आपल्या जीवनाचे आता एक अविभाज्य अंग बनले आहे. थोडक्यात महागाईचे भूत आपल्या मानगुटीवर कायमचे बसले आहे किंवा महागाई आपल्या पांचवीला पुजली आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.भारताला स्वातंत्र्य मिळाले व भारत एक विकसनशील देश ( Developing Country) बनला. जगामध्ये विकसनशील देशांमधील महागाई वाढीचे दर विकसित देशांमधील ( Developed Countries) महागाई वाढीच्या दरांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असतात असे आढळून आले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ६३ वर्षे झाली. या काळात भारताने पुष्कळ प्रगती केली. आता तर भारत जागतीक आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने घोड दौड करीत आहे. असे असले तरी भारतातील महागाई वाढीचे दर अजूनही विकसनशील राष्ट्रांसारखेच आहेत व अजून कित्येक वर्षे ते तसेच राहतील असा या क्षेत्रातील तज्ञ मंडळींचा अंदाज आहे. २००४ मध्ये भारतात मंदी असल्यामुळे महागाई वाढीचा दर ४ टक्के एवढा खाली आला होता. तर सन २००८ मध्ये जागतिक मंदी असल्यामुळे भारतामधील महागाई वाढीचा दर, पहिल्यांदाच, शून्य तक्याच्या खाली गेला होता. अर्थात ही परिस्थिती फार दिवस टिकली नाही. हे दोन अपवाद वगळता भारतामध्ये महागाई वाढीचा दर वर्षाला ६% ते १२% मध्ये घोटाळतो आहे. अर्थात हे सरकारी आकडे आहेत. पण प्रत्यक्षातला महागाई वाढीचा दर या पेक्षा कितीतरी जास्त असतो असा सगळ्यांचा अनुभव आहे. विशेषतः जीवनावश्यक वस्तू जसे कि अन्न धान्य, डाळी, खाद्यतेले, किराणा भाजीपाला, स्वयापाकासाठी लागणारे इंधन, पेट्रोल, डीझेल, वैद्यकीय सेवा यांचे महागाई वाढीचे दर सरकारी आकड्यान पेक्षा नेहमीच जास्त असतात असे अनेकांचे म्हणणे आहे.

महागाई वाढली कि दोन गोष्टी घडतात. एकीकडे वस्तूंचे भाव वाढतात तर दुसरीकडे रुपयाचे अवमूल्यन होते. आज १०० रुपयांना मिळणाऱ्या वस्तूचा भाव उद्या १२० रुपये होतो. ही झाली भाव वाढ. तर उद्याच्या १०० रुपयांमध्ये आजच्या ८० रुपयांच्याच वस्तू येतील. हे झाले रुपयाचे अवमूल्यन. १९७५ साली पेट्रोलचा दर ५५ पैसे लिटर होता. त्यात १००% वाढ होऊन तो १रुपय १० पैसे लिटर झाला ( हल्लीच्या तरुण पिढीला ही गोष्ट एखाद्या परीकथे सारखी वाटेल). २०१० मध्ये पेट्रोलचा भाव लिटरला ५० रुपयांच्या वर गेला आहे. याच दराने २०२० मध्ये पेट्रोलचा भाव लिटरला ५०० रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्वी एक लाख रुपयाला जी किंमत होती ती आज राहिली नाही. पूर्वी लाखोपती किंवा लक्षाधीश मंडळी श्रीमंत वर्गात मोडली जायची. आज ती मंडळी मध्यम किंवा उच्च मध्यम वर्गात मोडली जातात.
महागाई वाढली कि खर्च वाढतात. पूर्वी महागाईची झळ गरिबांना बसायची. पण आता महागाईची झळ मध्यम वर्गीयांबरोबर श्रीमंतांना पण बसू लागली आहे. बर्याच जणांचे आजचे उत्पन्न पुरेसे असल्यामुळे ते आजच्या महागाईला यशस्वीपणे तोंड देऊ शकतात. पण ते उद्याच्या महागाईला तोंड देऊ शकतील का याची त्यांना सुध्धा शंका वाटते. त्यामुळे महागाई शी मुकाबला कसा करायचा हा यक्ष प्रश्न सर्वांपुढेच आहे .

उत्पन्न वाढवणे आणि खर्च कमी करणे हा महागाई शी मुकाबला करण्याचा सर्वात साधा, सरळ आणि प्रभावी उपाय आहे. पण तोच सर्वात जास्त अवघड व कठीण आहे. कारण ज्या प्रमाणात महागाई वाढते त्या प्रमाणात उत्पन्न वाढत नाही असा अनेकांचा अनुभव आहे. तसेच एकदा सुरु केलेला खर्च एकदम कमी करणे शक्य नसते. विशेषतः घेतलेली कर्जे फेडण्यासाठी, मुलाबाळांचे शिक्षण, कुटुंबाचा चरितार्थ चालवणे, कुटुंबाचे स्टेटस मेंटेन करणे, वैद्यकीय सेवा यांसाठी सुरु केलेला खर्च एका रात्रीत कमी करणे शक्य नसते. एखादी जादूची छडी फिरवावी त्याप्रमाणे सरकार महागाई आटोक्यात आणेल या आशेने अनेक जण सरकारकडे बघत आहेत. पण महागाई कमी करणे ही गोष्ट आता सरकारच्या नियंत्रणामध्ये राहिलेली नाही असे वाटते. त्यामुळे महागाई शी मुकाबला करण्यासाठी संपूर्णपणे सरकारवर अवलंबून न राहता वैयक्तिक पातळीवर सुध्धा प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे. आणि हा मुकाबला अल्प काळासाठी नसून दीर्घ काळासाठी आहे याची जाणीव ठेवावी. मग महागाई शी मुकाबला कसा करायचा? या साठी दुसरा उपाय कुठला?

बचत; बचतीची चाणाक्षपणे केलेली गुंतवणूक ( Smart Investment) आणि त्यावर मिळणारा परतावा ( Returns) या त्रीसुत्रावर महागाई शी मुकाबला करणे शक्य आहे असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते? तुमचे काय विचार आहेत? तुमच्या दृष्टीने महागाई शी मुकाबला करण्याचा दुसरा कुठला चांगला उपाय आहे कां?

तुमचे विचार जरूर कळवावेत ही नम्र विनंती!

— उल्हास हरी जोशी

उल्हास हरि जोशी
About उल्हास हरि जोशी 31 Articles
श्री उल्हास जोशी हे गुंतवणूक विषयक सल्लागार असून ते Financial Health या विषयावर जनजागृती करतात. या विषयावरील त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. ते मेकॅनिकल इंजिनिअर असन ४० वर्षे मार्केटिंग आणि सेल्स या क्षेत्रात कार्यरत होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..