नवीन लेखन...

“आनंद” हाच भगवंत

गेले सारे आयुष्य

परि न कळला ईश

इच्छा राहिली अंतर्मनीं

प्रभू भेटावा एके दिनीं ।।

बालपणाचा काळ

करुनी अभ्यास नि खेळ

मनाची एकाग्रता

केली शरीरा करीता ।।

तरुणपणाची उमेद

जिंकू वा मरुं ही जिद्द

करुनी प्रयत्न्यांची पराकाष्ठा

बनवी जीवनमार्ग निष्ठा ।।

संसारातील पदार्पण

इतरासाठी समर्पण

वाढविता आपसातील भाव

जाणले इतर मनाचे ठाव ।।

काळ येता वृद्धत्वाचा

दाखवी मार्ग अनुभवाचा

भजन पूजेत जाई वेळ

ज्ञान गोष्टी सांगे सकळ ।।

आता झालो देह दुर्बल

प्रभू चिंतनांत जाई वेळ

वाट बघतो निरोपाची

ओढ फक्त जगदंबेची ।।

आयुष्य संपता सारे

खंत येवून मन विचारे

कां न प्रभू भेटला ?

ह्याची रुख रुख मनाला ।।

आत्मचिंतन करिता

जाणले मी भगवंता

ईश्वर निर्गुण निराकार

कर्म करी त्यास साकार ।।

सत्य दया क्षमा शांती

ह्याच ईश्वराच्या शक्ती

आयुष्यातील आनंदी क्षण

हीच ईश्वरी खूण ।।

जीवनातील समाधान

ईश्वरप्राप्तीचे लक्षण

नसावी मनी खंत

‘ आनंद ‘ हाच भगवंत ।।


Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..