नवीन लेखन...

सारी दुनिया का बोझ हम उठाते है

मित्रहो,

जन्माला आला हैला अन पाणी भरता भरता मेला. ही प्रसिध्द म्हण सध्याच्या युवा पिढीला तंतोतंत लागू पडते.मानवी जीवन म्हणजे काय तर अपेक्षा,अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न त्यातून झालेली अपेक्षापूर्ती किंवा अपेक्षाभंग.

आजच्या तरुणांना या अपेक्षेच्या ओझ्याखालीच वावरावे लागते.कुटुंबाच्या अपेक्षा,मित्रांच्या अपेक्षा,समाजाच्या अपेक्षा अन यात नवीन भर पडली आहे ती सरकारच्या अपेक्षांची.या ओझ्याखाली दबून जीव अगदी नकोसा झालेले कित्येक तरुण/तरुणी आपल्या आसपास दिसतात.किंबहुना त्यांच्यापैकी एक आपणही असतो.

पण काही जन या अपेक्षांच्या प्रेशरखाली दबून सुध्दा अधिक जोमाने काम करतात.रोजच्या व्यवहारातले पनीरचे उदाहरण घ्या ना.प्रचंड दाब दिल्यानंतर ते एकसंध होते.बाजारात चढ्या भावाने विकले जाते.असेच रोजच्या जीवनातील अनुभवातून रोज काही न काही शिकले पाहिजे. आपली मार्केट व्हॅल्यू आपल्यातील सुप्त गुणांचा विकास करुन वाढविले पाहिजे.कोणी किलोभर कांदे घेऊन श्रीमंत होत नसतो.हे कळाले तरी पुष्कळ आहे.

तेव्हा ओझ्याच्या प्रेशर कुकरला घाबरु नका.होऊ द्या पाहिजे तेवढ्या शिट्या.तेव्हाच तर तुमची डाळ शिजेल..

Avatar
About दीपक गायकवाड 33 Articles
दीपक गायकवाड हे महाराष्ट्रातील पहिली ऑनलाईन स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी- "आदित्य ॲकॅडमी" चे क्रिएटिव्ह डायरेक्टर तथा संस्थापक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..