नवीन लेखन...

मूळनावात बदल नको !

लग्नानंतर बायकोच्या मूळ्नावात नवर्याने बदल करावा की करू नये ? या विषयावर जवळ – पास दहा वर्षापूर्वी ‘मूळ्नावात बदल नको !’ या शिर्षकाखाली युवासकाळ मध्ये माझे मत प्रकाशित झाले होते. मूळ्नावात बदल नको या मतावर मी तेंव्हा ही ठाम होतो आणि आजही तितकाच ठाम आहे. मला वाटत होत ज्या विषयावर मी दहा वर्षापूर्वी मत मांडल होत तो विषय आता विषयच नसेल राहिला. पण ! तो विषय आजही ताजा आहे याच मलाच आश्चर्य वाटल. मी माझ्या भारतीय संस्कृतीचा चाहता आणि समर्थक ही आहे पण याबाबतीत मात्र माझ थोड वेगळ मत आहे. ते पूर्वीपासून तसच आहे. ज्या गोष्टी माझ्या मनाला पटत नाहीत त्याचा मी स्विकार करूच शकत नाही. आता काही दिवसापूर्वी मी टी.व्ही वर थोडया – थोडया अंतराने दोन मालिका पाहील्या मी पुरूष असूनही हया मालिक पाह्तो हे मी अभिमानाने सांगतो कारण भविष्यात माझ्यावर एखादी मालिका लिह्ण्याची वेळ आली तर मी कमी पडायला नको म्ह्णून. तशी शक्यता जवळ पास नाहीच. असो ! तो मुद्दा नाही. दोन्ही मालिकांत विषय एकच मूळ्नावात बदल करण्याचा पण दोन्हीकडे मला दोन मत प्रवाह दिसले. एका मालिकेतील नायिका मूळ्नावात बदल करण्याला विरोध करत होती आणि दुसर्या मालिकेतीला नायिका आपल्या होणार्या नवरयाशी मिळत – जुळ्त नाव शोधण्यासाठी आनंदाने आट्टहास करत होती. सध्याच्या मालिका आणि सामाजिक बांधिलकीचा काही संबंध असण्याची शक्यता जरा कमीच आहे. याला काही मालिका अपवाद असतात पण त्यांचे शतकही मुश्किलीने साजरे होते. असो ! तो आपला विषय नाही.

नवर्याच्या नावाशी मिळ्त जुळ्त नाव असावं म्ह्णून नवरा लग्नानंतर आपल्या बायकोच्या मूळ्नावात बदल करतो असं जर कोणी कारण देत असेल तर ते मुर्खपणाचच लक्षण म्ह्णावं लागेल नाही का ? अशी किती तरी नाव असतात ज्यांच्याबद्दल कवीच्या भाषेत सांगायच झाल तर त्यांचे यमक जुळ्त नसतात आता माझंच नाव घ्या निलेश दत्ताराम बामणे कशाशी काही जुळ्तय का ? नाही ना ! पण त्यामुळे कोणाच काही बिघडल का ? खरं म्ह्णजे हा इतका मोठा विषयच नव्हता, बायकोच्या मूळ्नावात बदल करण्याची प्रथा कधीच बंद व्हायला हवी होती. मला तर आता वाटत या अशा प्रथा सुरू ठेवण्यात या मालिका वाल्यांचाच अधिक हात असावा. लग्नानंतर बायकोच्या मूळनावात बदल करण्याबाबत पुरूष फार उत्साही असावेत अस मला नाही वाटत. लग्नानंतर आपल्या मूळ्नावात बदल न करण्याबाबत स्त्रिया आग्रही न राहिल्यामुळेच हया अशा प्रथा आजही सुरू राहिल्या असाव्यात.
उच्चशिक्षीत लोक फक्त स्वतः पुरता हा विषय मिटवून मोकळे होतात आणि समाजातील खालच्या वर्गात या अशा प्रथा तश्याच सुरू राहतात. आपल्या देशातील एक वर्ग पुरोगामी होतोय आणि एक वर्ग सनातनी होत चाललाय. एक वर्ग संस्कृती मानायला तयार नाही आणि एक वर्ग संस्कृती सोडायला तयार नाही. या दोन्ही वर्गाना आनंदी ठेवण्याच महान कार्य सध्याच्या टी.व्ही. वरील मालिका करीत आहेत. पण त्यामुळेच आजची पिढी व्दिधा मनस्थितीत सापडतेय याकडे कोणाच लक्षच जात नाही. मूळ्नावात बदलाचा आणि संस्कृतीचा काही संबंध असावा अस मला वाटत नाही आणि तसा जर तो कोणी जाणून-बुजून लावला असेल तर तो भाग वेगळा. आजही लग्नानंतर स्त्रिया तडजोड करायला तयार असतात हे सत्य नाकारता येत नाही मूळ्नावात बदल हे त्याचच एक जिवंत उदाहरण म्ह्णून घेता येईल अस चित्र निदान मला तरी आज दिसतय. हे चित्र पुरूष बदलणार नाहीत. हे चित्र आजच्या स्त्रियांनीच बदलायला ह्वं . त्या ते बदलतील अशी आशा बाळगायला आज तरी कोणाची हरकत नसावी.

— निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..