नवीन लेखन...

निसर्गोपचार

आपण नॅचरोपॅथी द्वारे पुर्ण शरीराची काळजी घेऊ शकतो. पारंपारिक आजार दुर करण्याची क्षमता नॅचरोपॅथी मध्ये आहे. २० व्या शकाच्या सुरवातीस नॅचरोपॅथी ३ उच्च तत्वावर आधारीत होती.

माणसाचा नैसर्गिक आजार बरा करण्याच्या प्रवृत्तीवर भर दिला जात असे. लक्षणांपेक्षा प्रत्यक्ष आजाराचा शोध घेतला जात असे. फक्त थेरेपीचा वापर केला जात असे. त्यात कुठल्याही प्रकारची इजा होत नसे.

नॅचरोपॅथीचे डॉक्टर रोग्याच्या जीवन पध्दतीकडे जास्त लक्ष देत असतात. नॅचरोपॅथी मध्ये फिजीकल, फिजीकोलॉजीकल, तसेच स्पिरिच्यूअल घटक आजारामध्ये लक्षात घेतले जातात.

नॅचरोपॅथीमध्ये रोग्यावर उपचार करताना अनेक अल्टरनेटिव्ह थेरेपीचा वापर करतात उदा. होमिओपॅथी, हर्बल रेमिडीज, पारंपारीक चायनीज औषध उपचार, डाएट आणि न्युट्रिशन, योग, अॅक्युप्रेशर, हायड्रोथेरेपी, मॅगनेट थेरेपी, मसाज आणि व्यायाम.

नॅचरोपॅथी चे डॉक्टर अधिकृत नॅचरोपॅथी मेडिकल स्कुल मध्ये शिक्षण घेतलेले असतात. पहिले वर्ष सामान्य वैद्यकिय शास्त्राचे शिक्षण दिले जाते त्यानंतर शेवटच्या वर्षात नॅचरल हिलींग टेक्निकवर शिक्षण दिले जाते.

निसर्गोपचार ही आरोग्याची अशी एक नैसर्गिक उपचार पध्द्ती आहे जी शरीराची आणि मनाच्या स्वास्थ्य आणि रोगासंबंधी काळजी घेते.

पृथ्वीवरील लोकांना त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नांसाठी, रोगांसाठी आणि उपचारांसाठी ज्या पध्दती उपलब्ध आहेत, त्या सगळ्यांमध्ये एक निसर्गोपचाराची पध्दत उत्तम आहे. यात जीवन जगण्याच्या सगळ्या तत्वांचे एकीकरण झाले आहे आणि हीच एक पध्दत अशी आहे की जी मानवाला त्याच्या आजच्या वाढत्या रोगराई पासून आणि त्यापासून निर्माण होणा-या धोक्यातून बाहेर काढू शकते. जीवनातील प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी जीवन जगण्यासाठी आवश्यक अशा सगळ्या तत्वांचा या पध्दतीत वापर केला जातो.

तुम्ही तुमचे आरोग्य विकत घेऊ शकत नाही, ते तुम्हाला योग आणि नैसर्गिक आरोग्याच्या मदतीने उभे करावे लागते. येथे आरोग्याची बांधणी करावी लागते विकत नाही घेता येत. औषधांचा जास्त प्रमाणात वापर केल्याने त्यांचे जे इतर परिणाम होतात, ते शरीराला हानिकारक असतात. सामान्य जनतासुध्दा आता या मुद्यावर सावधपणे विचार करत आहे. निसर्गोपचार पध्द्ती ही सर्वश्रेष्ठ उपचार पध्द्ती आहे हे आता ते मान्य करु लागले आहेत. या उपचार पध्दती बरोबर पातांजली योगसूत्रांचा वापर केला पाहिजे. ती योगसूत्रे या प्रमाणे – यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यामुळे तुम्हाला संपूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभेल. आत्मविश्वास संपादन करण्यासाठी आणि आरोग्य राखण्यासाठी यांचा उपयोग होईल.

डॉ. गौरी पाटील
निसर्गोपचार तज्ञ, मुंबई
9820584716

Avatar
About डॉ. गौरी पाटील 11 Articles
डॉ. गौरी पाटील या बोरीवली, मुंबई येथील निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..