नवीन लेखन...

औचित्य जागतिक दृष्टीदान दिनाचे !



|| हरि ॐ ||

परमेश्वर निर्मित निसर्गातील विविध आकारांची, रंगांची, आणि चवीची फळे, रंगीबेरंगी वेगवेगळया आकाराची फुले, उंच उंच डोंगर, दर्याखोरी, खोल, रुंद व विस्तीर्ण खळखळणाऱ्या अवखळ नद्या, निळागर्द शांत क्षितिजाला भिडलेला अथांग समुद्र, वनराया विविध आकारातील, रंगातील प्राणी, पक्षी, कीटक

तसेच चित्र व शिल्प, देवांची निर्गुण रूपातील विविध चित्र व रूपं आणि मुख्य म्हणजे सदगुरुंना भरभरून बघून हृदयात साठवून ठेवणारे इंद्रिय म्हणजे डोळे.

मानवाच्या शरीराची पंच इंद्रिये त्यांना नेमून दिलेले कार्य करणारी असतील तर त्यांचा उपयोग आहे. शरीरावर नुसती पंचेंद्रिये असून काय फायदा? ती सशक्त, सुद्रुढ व कार्यरत नसतील तर काय कामाची? तसेच अगदी सुंदर रेखीव मासोळीदार काळेभोर टपोरे डोळे आहेत पण ते बघू शकत नाहीत तर त्यांचा काय उपयोग? दैनंदिन जीवनात पदोपदी डोळ्यांची आवश्यकता भासते. प्रत्येक गोष्ट बघण्याची क्रिया डोळ्यांनी होते पण तेच कमकुवत किंवा पूर्ण दृष्टीहीन असतील तर काय होईल?

कवितेत किंवा लेखात निसर्गाचे वर्णन कितीही सुंदर केलेले असेल किंवा कितीही सुंदर चित्र असेल आणि त्याचे अगदी सोप्या भाषेत रसाळ वर्णन लिहिलेले असेल तरी एखाद्या अंध व्यक्तीने ती गोष्ट आपल्या डोळ्यांनी जन्मताच बघितली नसेल अनुभवली नसेल त्यांना ते फिलिंग कसे येणार? तर मग त्या वर्णनाला, लिखाणाला अर्थ आहे का? ज्या व्यक्तीला दिसत होते पण अपघातात किंवा एखाद्या असाधारण आजारात दृष्टी गेली तर त्या व्यक्तीला रोजचे जीवन जगताना त्या आठवणीने आणि यातनेने जीव किती दु:खी होईल याचा विचारच करवत नाही. पाच मिनिटे लाईट गेले तर आपली काय अवस्था होते ते सर्वांनी अनुभवले असेल !

हो, आपल्या देशात आज कोट्यांनी अशी बालके, स्त्री/पुरुष आहेत की जे जन्मत:च अंध आहेत तर कोणाला थोडे तर काहींना अजिबात दिसत नाही म्हणजे ते निसर्गाच्या विलोभनीय दृष्यांपासून वंचित आहेत. त्यांच्या वयक्तिक, सामाजिक व आर्थिक विकास म्हणावा तसा झालेला नाही का तर त्यांना दृष्टी नाही, ते हे सुंदर जग पाहू शकत नाहीत व सगळ्या भौतिक दृश्य गोष्टीं पासून वंचित आहेत. परंतू आपली इच्छाशक्ती असेल तर आपण अश्या अंध व्यक्तींना डोळस बनवू शकतो आणि श्रद्धा व सबुरीने ते नक्की शक्य आहे. पण त्यासाठी पुढील गोष्टींची पूर्तता करावी लागते.

जसे आपण जिवंतपणी रक्तदान किंवा एखाद्या आपल्या जवळच्या नातलगाला किडणी दान करतो तसेच आपण मरणोत्तर आपले नेत्र दान करू शकतो. यासाठी अगोदर आपली लेखी संमती एका विहित नमुन्यातील अर्जात भरून आपल्या नजीकच्या सरकारी (सायन, जे.जे. आणि के.इ.एम. रुग्णालय) किंवा खाजगी अधिकृत नेत्र पेढीशी संपर्क साधून करावी लागते. काही असाध्य आजार जडला असल्यास त्या व्यक्तीस नेत्र दान करता येत नाही.

कित्येक वर्षापूर्वी महालक्ष्मी जत्रेला जाताना एका लहान गुजराती मुलीचे अपघातात निधन झाले. तिचे डोळे खूप सुंदर होते. अश्या प्रसंगी त्या मुलीच्या वडिलांना डॉक्टरांनी मरणोत्तर नेत्रदानाचे महत्व पटवून दिले. आणि डॉक्टरांनी हे ही सांगितले की कमीतकमी दोन अंध व्यक्तीमध्ये तुम्हाला तिचे डोळे पाहता येतील. समयसूचकता आणि गांभीर्य दाखवत तिच्या वडिलांनी त्याला होकार दिला. या घटनेचा गुजराती वृत्तपत्रात उल्लेख करण्यात येऊन गुजराती बांधवांत मोठा प्रचार आणि प्रसार झाला.

मुंबईत जेमतेम २००० ते ३००० हजार व्यक्ती मरणोत्तर दृष्टीदान करतात. त्यात सर्वात जास्त नेत्रदान करणारे गुजराती बांधवांचा वाटा आहे. मराठी बांधव जेमतेम २० टक्के आहेत.

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर लौकरात लौकर डॉक्टरांना पाचारण केल्यास त्या मृतव्यक्तीचे डोळे डॉक्टर घराच्या घरी १५ ते २० मिनिटात काढू शकतात. त्यासाठी मृत्व्याक्तीच्या दोन्ही डोळ्यांवर ओला रुमाल ठेवणे गरजेचे आहे. त्याच्या डोक्यावर पंखा चालू नसावा. त्याचे डोके उशीवर ठेवणे गरजेचे आहे.

वरील गोष्ट करणे जमात नसेल तर ‘१९१९’ हा नंबरावर फोन करावा. हा नंबर तुम्ही ज्या एरियात राहत असला त्या क्षेत्रातील राहणाऱ्या स्वयंसेवकाचा असेल. त्याला तुमचा पूर्ण पत्ता दिल्यास तो विनामुल्य तुमच्या राहत्या घरी एकतासाच्या आत स्वखर्चाने डॉक्टरांना घेऊन येईल व मृत व्यक्तीच्या डोळ्यांचा कार्निया अथवा पूर्ण डोळे अर्ध्या तासाच्या आत काढून नेईल. तुम्हांला कुठलाही खर्च करण्याची आवशकता नाही. या नंबरची शहानिशा आपण आधीही करून घेऊ शकतो.

जागतिक नेत्रदान दिनी, आपले मित्र, मैत्रिणी, शेजारी व नातलग यांना नेत्रदानाचे गांभीर्य पटवून सांगून त्यांना यात सहभागी करून घेऊ. कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करायला मुहर्त बघावा लागत नाही. म्हणून आज जागतिक नेत्रदान दिनी आपण सर्व असा निर्धार करू की आपण आपले डोळे मरणा नंतर आपल्या अंध देशबांधवांसाठी दान करून परमेश्वराने आपल्याला डोळस जन्माला घातल्याचे व समाजाचे आपल्यावरील ऋण या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन फेडता येण्यासारखे आहे. आपल्या नेत्र दानाने देशातील दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते.

<जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..