नवीन लेखन...

आहारातील एकरुपतेचा अनुभव

सुमारे वर्षभरापुर्वीची गोष्ट आहे. मी आणि माझी पत्नी बाबांच्या मित्राकडे शिबीराला जात होतो. माझी तब्येत बिघडली होती. जुलाब होत होते. सकाळपासून पाच सहा झाले होते. तरीही शिबिराला गेलो होतो. सर्व औषधे हाताशी होती पण गुण येत नव्हता. रात्रीचे जेवण आले तेव्हा मनात विचार आला हे खाल्ले तर त्रास होईल पण सर्वांबरोबर आहोत तर न खाणे योग्य नाही म्हणून जेवलो.

रात्री खूप त्रास झाला. उलट्या झाल्या जुलाब तर किती झाले हे आठवतही नाही. चार वाजे पर्यंत झोप नाही. विकनेस खूप आला होता. डीहायड्रेशनची भिती वाटायला लागली होती. सकाळी साडेसातला काकांना म्हटले मी घरी जातो मला डीहायड्रेशन होण्याची शक्यता वाटतेय. त्यांनी थांबायला सांगितले. आमचेकडील सर्व औषधे हाताशी होतीच तरी अँलोपाथीच्या गोळ्या मागवल्या. पण कोणतेही औषध घेतले नाही. साडेआठला नाष्टा आला. उपीट होते. अगदी थोडे घेतले. आणि प्रत्येक घास खाताना नव्हे तर प्रत्येक घास चावताना एकच विचार करत होतो की या खाण्याचा प्रत्येक कण अन् कण मला एनर्जी देणार आहे. माझा सगळा आजार पुर्ण बरा होणार आहे.

आणि चमत्कार अनुभवला.

कोणतेही औषध न घेता साडेनऊ नंतर जुलाब थांबले होते. साडेदहाला मी इतका फ्रेश होतो की कुणी म्हटले असते तर पुण्याहून कोल्हापूरला बाईकवर जाऊन परत येण्याची तयारी होती. (प्रत्यक्षात जायचा योग आला नाही)

हे कां घडले?

माझ्या मते कारण एकच पाँझीटीव्ह विचार. जे उपीट खाताना मी करत होतो. कारण उपीट हे काही जुलाब थांबायचे औषध नाही, नक्कीच!

हा अनुभव आल्यावर रोजच्या जेवताना, काही खाताना आपण काय विचार करतो? हे निरीक्षण केले. बहूतेक वेळा टीव्ही समोर बसून जेवतो. खाण्यावर लक्ष नसते तर सिरियलस् मध्ये चालू असलेले निगेटीव्ह विचार खाण्यातून कॅरी करत असतो. काय परीणाम होणार?

बस्स ठरवले जेवताना टीव्ही, मोबाईल बंद! पुर्ण लक्ष जेवणाकडे!!

भूषण जोशी

आरोग्यदुत या WhatsApp ग्रुपच्या सौजन्याने..

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 116 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..