नवीन लेखन...

जीवघेणा खेळ करणारी फौलादी मनगटे घोषणा देण्यासाठी उठतात तेंव्हा..!!

भीमथडीच्या तट्टांना यमुनेचे पाणी पाजणाऱ्या मराठ्यांना झालंय तरी काय? मुघलांच्या आणि अनेक शाह्यांच्या छाताडांवर थयथया नाचून स्वत:च्या मनगटातील ताकदीवर ह्या देशात हिन्दवी स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची वंशपरंपरा मोठ्या अभिमानाने मिरवणाऱ्या ‘द ग्रेट मराठ्यां’नी आरक्षणासाठी इतकं लाचार का व्हावं..?

काळ्या छातीवर कोरलेली अभिमानाची ती लेणी कुठे खचली ? जीवघेणा खेळ खेळणारी फौलादी मनगटे घोषणा देण्यासाठी का उठावीत?

अरे आठवा तो आपला मराठ्यांचा दैदीप्यमान इतिहास..छत्रपती शिवाजी महाराजांनी यवनांच्या दाराशी मोर्चा नेऊन मला स्वराज्य द्या म्हणून निवेदन नव्हतं दिलं..महाराजांनी जे मिळवलं ते स्वत:च्या कर्तुत्वावर आणि म्हणूनच अलम दुनिया आज महाराजांचं नांव आदराने घेते..आपल्याला जे मिळवायचंय ते आपण आपल्या कर्तुत्वाने मिळवू आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिमान वाटेल असं वागू असा विचार आपण का नाही करत?

दाही दीशा आपल्या टाचेखाली ठेवणाऱ्या मराठ्यांना आरक्षणाच्या भिकेसाठी मोर्चे काढताना पाहून एक मराठा म्हणून मला योग्य वाटत नाही..*अखिल हिन्दुस्थानवर राज्य केलेल्या रक्षणकर्त्या मराठ्यांनी मोर्चा काढायचाच तर सर्वच आरक्षण रद्द करावे म्हणून मोर्चे काढावेत.. निढळाच्या घामाला ओळख मिळावी म्हणून मोर्चे काढावेत*..

-गणेश साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..