नवीन लेखन...

सागर- किनारा

सागर किनाऱ्याच्या नात्यामध्ये ,
एकदा झाला मोठा वाद,
सागराचे रौद्र रूप पाहूनी,
किनाऱ्याने दिलीच नाही साद…

फेसाळलेल्या लहरी मधुन,
तो ओकत होता आग,
सूर्य गेला समजवण्यास ,
पण तोही झाला बाद…

खवळलेल्या लाटांनी मग,
मस्तक आपटले किनाऱ्यावर,
हळूच वरती पाहुनी,
शिंपडले पाणी सूर्यावर…

शेवटी चमचमत्या चांदण्यांचं,
आकाश आले भेटीला,
सुंदर शांत संध्या,
होती त्यांच्या जोडीला…

आक्रोश करून सागराने ,
शेवटी स्मित हास्य केलेच,
दूर दृष्टीस गाभाऱ्यातील,
प्रीत मंदिर दिसले,
प्रीत मंदिर दिसले…

– श्र्वेता संकपाळ

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..