नवीन लेखन...

पहाट…

भल्या पहाटे कोकीळ नावाचा भाट गाऊ लागतो
त्याच्या भैरवाचे सूर मनात रूंजी घालू लागतात थंडगार झुळुकांनी आम्रवृक्षांचा गंधित धूप दरवळू लागतो..
उगवत्या सूर्यबिंबाच्या मस्तकी टिळ्याने शुचिर्भूत आकाश अधिकच तेजस्वी दिसते
पक्ष्यांच्या कूजनाने काकडआरती होते
पुराणपुरुष डोंगरही आळस झटकून वेदऋचा म्हणण्यास ताजेतवाने होतात
आणि हा निसर्गाचा व्यापार पाहत मी जागी होते…
पौर्णिमेचे चंद्रबिंब उत्तररात्री डोळ्यात साठवून मिटलेल्या पापण्याही आता चांदणतेजाने माखून गेलेल्या असतात….

Avatar
About आर्या आशुतोष जोशी 21 Articles
संस्कृत विषयातील विद्यावाचस्पती पदवी. हिंदू धर्म, भारतीय संस्कृती, तत्वज्ञान, इतिहास या विषयातील संशोधन आणि लेखन, व्याख्याने आणि शोधनिबंध

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..