![32248](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2014/12/32248.jpeg)
सातारा शहरापासून पूर्वेच्या भागात सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये महादेव रांगेचे श्रृंग वसलंय. या श्रृंगातच नांदगिरी म्हणजे कल्याणगड हा किल्ला वसला आहे. पायथ्याशी नांदगिरी अर्थात धुमाळवाडी गाव असल्याने या किल्ल्याला नांदगिरी हे नाव मिळालं आहे. सातारा रोड रेल्वे स्थानकापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर नांदगिरी हे गाव आहे. या गावात ठिकठिकाणी आपल्याला उसाची आणि ज्वारीची शेती नजरेस पडते.
कल्याणगड सर करताना अगदी सुरुवातीला पक्क्या रुपात दगडी पायर्या आहेत. पण त्यानंतर गडमाथा संपेपर्यंत चढाईसाठी पायवाट ही फक्त मुरवाड स्वरुपाची आहे. समुद्रसपाटीपासून या गडाची उंची ३५०० फूट इतकी आहे.
![](/imagesarticle/32248/Image-2_471375355497003.jpg)
![](/imagesarticle/32248/Image-5_312009421875700.jpg)
— सागर मालाडकर
Leave a Reply